मोशी (प्रतिनिधी) – देहू आळंदी रस्त्यावर डुडूळगाव ते गावठाणपर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर वाहने भरधाव वेगाने जात असतात. या मार्गावर अनेक शाळकरी विद्यार्थी नागरिक व सोसायटीमधील रहिवासी रस्त्याने ये-जा करीत असतात, या ठिकाणी सुमारे दीड किलोमीटरपर्यंत एकही गतिरोधक नाही.
त्यामुळे वाहनचालकांच्या मनमानीपणाला लगाम बसत नसून वाहने अतिशय वेगाने जातात. परिणामी या मार्गावर अपघात होण्याची दाट शक्यता देखील नाकारता येत नाही. त्यामुळे या ठिकाणी कमीत कमी पाच गतिरोधक बसवावेत, अशी मागणी येथील स्थानिक नागरिक करीत आहेत. याची दखल प्रशासनाने घेऊन त्वरित या मार्गावर गतिरोधक बसवावेत, तरच पुढील अनर्थ टळेल. असे नागरिक बोलत आहेत.