इंदापूर : महायुतीच्या माध्यमातून राज्यातील धनगर समाजाला जे कधीच मिळाले नाही ते शासनाच्या माध्यमातून मिळाले आहे.यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोलाची भूमिका बजावल्याने,बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांना लोकसभेत विक्रमी मताने पाठवण्यासाठी धनगर समाज सज्ज झाला,असल्याची माहिती
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष डॉ.शशिकांत तरंगे यांनी दिली.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष डॉ.शशिकांत तरंगेयांनी इंदापूर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत तरंगे बोलत होते. पुढे माहिती देताना प्रदेश कार्याध्यक्ष डॉ.शशिकांत तरंगे म्हणाले,सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नामकरण,बारामती येथील कॉलेजला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नामकरण, अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी नगर नामकरण,हे कोणी केले तर त्याचे उत्तर महायुती आहे.धनगर समाज बांधवांसाठी,शासनाच्या 23 योजना पैकी बहुतेक योजना चा निधी उपलब्ध करून दिला.त्यामध्ये धनगर बांधवांसाठी घरकुल योजनात तब्बल दहा हजार घरकुले देण्याची भूमिका,याच योजनेमधून इंदापूर तालुक्यातील बांधवांना बाराशे घरकुलांचा लाभ,या गोष्टी धनगर समाज विसरणार .
राज्यातील 5000 धनगर मुला-मुलींना स्कूलमध्ये निवासी मोफत प्रवेश,शासनाच्या महामेष योजनेतून हजारो धनगर बांधवांनातीन लाख रक्कम शेळी मेंढी खरेदी खरेदीसाठी मिळतात.या समाज बांधवांच्या मुलांच्या शिक्षणासाठी वस्तीग्रहपहिल्या टप्प्यात नाशिक येथे सुरू झाले.दुसऱ्या टप्प्यात पुणे येथे सुरू होणार आहे.
शेळी मेंढी महामंडळाला लोकसभा निवडणूक लागण्या अगोदरच 100 कोटीचा निधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिळवून दिला.हे कदापी धनगर समाज बांधव विसरणार नाहीत.त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात मोठ्या संख्येने असणारा धनगर बांधवसुनेत्रा पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आहे अशी ही माहिती डॉ.तरंगे यांनी दिली.
रासप चे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनाराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष अजित पवार यांनी आपल्या पक्षाच्या कोट्यातून परभणी येथे लोकसभेची जागा दिली.इंदापूर विधानसभेला सलग दोन वेळा आमदार दत्तात्रेय भरणे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातूनच संधी मिळाली व माजी मंत्री प्राध्यापक राम शिंदे यांना विधान परिषदेवर भारतीय जनता पार्टीने संधी दिली. त्यामुळे
राज्यातील एकही धनगर बांधव महायुतीच्या विरोधात जाणार नाही असाही विश्वास राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष डॉ.शशिकांत तरंगे यांनी व्यक्त केला.