फलटण – फलटण तालुक्यातील कारखानदारांनी गेल्या वर्षीच्या उसाला अंतिम भाव 3300 ते 3400 रुपये जाहीर करावा, अन्यथा कारखानदारांच्या नावाने बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल असे निवेदन शेतकऱ्यांच्यावतीने फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांना देण्यात आले आहे.
फलटण तालुक्यातील श्रीराम सहकारी साखर कारखाना, स्वराज्य इंडिया लिमिटेड उपळवे, शरयू शुगर प्रायव्हेट लिमिटेड, मोटेवाडी व श्री दत्त इंडिया शुगर, साखरवाडी या कारखानदारांनी गेल्या वर्षीच्या उसाला अंतिम भाव 3300 ते 3400 रुपये जाहीर करावा, अन्यथा कारखानदारांच्या नावाने बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.
बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना या कारखान्यांनी अनुक्रमे 3411 व 3350 चे अंतिम दर मागील हंगामातील उसासाठी जाहीर केलेले आहेत. फलटण तालुक्यातील कारखानदार मूग गिळून गप्प आहेत. शेतकरी कष्टकरी जनतेच्या बाजूच्या सर्व विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बोंबाबोंब आंदोलनाचा इशारा दिला निवेदन देताना आझादसिंह उर्फ शंभूराज खलाटे, अशोक सस्ते, बजरंग गावडे, महादेवराव कदम, मच्छिंद्र निकम यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.