म्हसवड – ग्रामीण भागात माणगंगा शैक्षणिक संकुल उभा करून खर्या अर्थाने संत गाडगे महाराजाचे विचारांचा वारसा गोरगरिब विद्यार्थ्याना शिक्षण देवून केला जात असल्याचे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष नितीन दोशी यांनी केले. मासाळवाडी, ता. माण येथील माणगंगा शैक्षणिक संकुलात श्री संत गाडगे महाराज पुण्यतिथी सोहळा नुकताच संपन्न झाला. यावेळी दोशी बोलत होते. यावेळी म्हसवड नगरपरिषद म्हसवड चे माजी नगराध्यक्ष नितिन दोशी, प्राचार्य डी. वाय. ओंबसे, डॉ. विकास बाबर, संजय भागवत, राजेंद्र भागवत, संस्था अध्यक्ष डॉ. वसंत मासाळ, उपाध्यक्ष सुखदेव मासाळ उपस्थित होते.
दोशी म्हणाले, मासाळवाडीच्या माळरानावर शैक्षणिक संकुल उभा करून ग्रामीण भागातून मेडीकल कॉलेज उभा केले. त्या माध्यमातून शेकडो विद्यार्थी स्वावलंबी केले ते स्वतःच्या पायावर उभे राहून आपल्या कुटुंबाला हातभार लावत आहेत. अहिंसा पतसंस्था नेहमीचं शैक्षणिक कामासाठी अग्रेसर राहिली आहे. दोन वर्षापूर्वी येथील विद्यार्थ्याना बसण्यासाठी 15 बेंचची सोय पतसंस्थेच्या माध्यमातून केली होती,याही पुढे संकुलासाठी भविष्यात लवकरच सुरू होणार्या माणगंगा ज्युनिअर कॉलेज साठी भरीव आर्थिक मदत करेल.
आयटीआय कॉलेजचे प्राचार्य यांनी गाडगे बाबा यांच्या विचारांचे अभंग वाणी आणि बाबांनी आपल्या आयुष्यात स्वच्छते बरोबर माणसांच्या मनातील स्वच्छ्ता करून आपण सदविवेक मार्गाने जगु ही शिकवण त्यांनी विद्यार्थ्याना पटवून दिली. त्यांनी संकुला विषयी बोलताना डॉ वसंत मासाळ व सौ सविता हे आताच्या काळातील मासाळवाडी व परिसरातील ग्रामस्थांसाठी , विद्यार्थ्यांसाठी कर्मवीर अण्णा व लक्ष्मी वहिनी आहेत. या भागातील मुलांना व्यवसाय शिक्षण, इंग्रजी माध्यमाची शाळा चांगल्या प्रकारे चालवीत आहेत त्यांना येथील शिक्षक साथ देत आहेत असे सांगितले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ वसंत मासाळ यांनी संस्था गाडगे बाबांनी जे विचार घालून दिल्या त्या विचारावर चालवण्याचा प्रयत्न करीत आहे असे सांगितले. कॉलेज व शाळेमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्याची गाडगे महाराज यांच्या चरित्रावर आधारित भाषणे झाली. लेझीम ढोल तालात पाहुण्याचे स्वागत करण्यात आले.