कराड : जीवनावश्यक वस्तुंखेरीज इतर दुकाने वारंवार आवाहन करुनही सुरु ठेवल्याप्रकरणी शहरातील तीन व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली.
विकास लक्ष्मण देसाई (वय २८, रा. काले), राजेश उत्तमराव पाटील (४०, रा. कराड), अनिल रामदास तांबे (५४, रा. कार्वेनाका, कराड) अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यापाऱ्यांची नावे आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी गर्दी न करण्याचे, आवश्यक असल्यासच बाहेर पडण्याचे, आत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याचेही आदेशीत केले आहे. त्याची येथील बाजारपेठेत त्याची अंमलबजावणी करण्यात आली. त्यानुसार बाजारपेठेतील आत्यावश्यक सेवेची दुकाने व मेडिकल वगळता अन्य दुकाने, हॉटेल पोलिसांनी बंद केली. त्यानंतरही पोलिसांनी वारंवार आवाहन करुनही या व्यापाऱ्यांनी दुकाने सुरुच ठेवली. त्यामुळे या तीन व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.