चिरीमिरीची अपेक्षा न ठेवता माणुसकी जपण्याचे आवाहन
सातारा – एकीकडे आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना दुसरीकडे मात्र गेली 75 वर्षे दिव्यांग बांधवांच्या मागण्यांकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाले आहे. मात्र, आता हा अनुशेष आम्ही भरुन काढणार आहे. दिव्यांग बांधवांना करात सवलत, विविध स्टॉल्स देण्याबरोबर त्यांच्या मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेणार असून या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना सोडणार नाही, असा इशारा दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी येथे दिला.
येथील जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुद्देशीय सभागृहात दिव्यांग मेळाव्यात श्री. कडू बोलत होते. बच्चू कडू म्हणाले, “”राज्यातील दिव्यांगांच्या 123 शाळांचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येणार असून जिल्ह्यातील प्रत्येक दिव्यांगांपर्यत प्रशासनाने पोहचून दिव्यांगांसाठी असणाऱ्या विविध योजनांमधून त्यांना आर्थिक बळ द्यावे.
दिव्यांगांचा प्रत्येक प्रश्न सहानभूतीपूर्वक विचार करुन तातडीने मार्गी लावावा. दिव्यांगांच्या बचत गटांना तसेच उद्योगवाढीसाठी प्रत्येक तहसील, प्रांत व ग्रामपंचायतीमध्ये स्टॉल देण्याचे धोरण लवकरच आणणार आहे. ग्रामीण भागातील दिव्यागांना घरांसाठी गट विकास अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी. दिव्यांगांच्या घरासाठी 2 लाख 50 हजार रुपये अनुदान मिळावे यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे.” जिल्हा प्रशासनाने मोठ्या मॉल उद्योगांमध्ये दिव्यांगांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावेत. दिव्यांग बांधवांचे प्रश्न सेवाभावी वृत्तीतून सोडवण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.
आर्थिक बळ द्यावे. दिव्यांगांचा प्रत्येक प्रश्न सहानभूतीपूर्वक विचार करुन तातडीने मार्गी लावावा. दिव्यांगांच्या बचत गटांना तसेच उद्योगवाढीसाठी प्रत्येक तहसील, प्रांत व ग्रामपंचायतीमध्ये स्टॉल देण्याचे धोरण लवकरच आणणार आहे. ग्रामीण भागातील दिव्यागांना घरांसाठी गट विकास अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी. दिव्यांगांच्या घरासाठी 2 लाख 50 हजार रुपये अनुदान मिळावे यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे.” जिल्हा प्रशासनाने मोठ्या मॉल उद्योगांमध्ये दिव्यांगांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावेत. दिव्यांग बांधवांचे प्रश्न सेवाभावी वृत्तीतून सोडवण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.
दिव्यांगांच्या योजना राबवण्यासाठी माणुसकी महत्वाची असून कायद्याबाहेर जाऊन काम केले म्हणून कोणी मरणार नाही. शासनाचा आपण पगार घेतो निदान तेवढे तरी काम करा. चिरीमिरी, पैसे भेटतील ही भावना न ठेवता माणसुकी जपा. केवळ पगारापोटी काम करुन जमणार नसून आमदार, खासदार, कलेक्टरची घरामागे घरे झाली. मात्र, दिव्यांगांना साधे घरकुल मिळत नाही, अशी खंत बच्चू कडू यांनी व्यक्त केली. शासनाचा लाखो रुपयांचा निधी परत जात असतानाही दिव्यांगांना न्याय मिळत नाही. कलेक्टर आणि सीईओंनी मनात आणले तर राज्यकर्त्यांपेक्षा ते चांगली कामे करु शकतात. बीडीओ, ग्रामसेवकांना ठणकावून सांगावे लागणार असून केवळ निलंबित न करता त्यांचा दोन दिवसांचा पगार कमी करण्याची गरज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.