मुंबई – वादग्रस्त वक्तव्यांसाठी आणि अजब तर्कटांसाठी प्रसिद्ध असलेले श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा नवा वाद ओढवून घेतला आहे. काही दिवसांपूर्वी भिडे गुरुजी यांनी अमरावती येथील एका कार्यक्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह असे वक्तव्य केलं होत. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते.
मात्र, अश्यातच संभाजी भिडे यांच्याविरोधात महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी आक्रमक झाले असून, त्यांनी पुण्यात संभाजी भिंडे यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. कलम 499 अब्रू नुकसानी करणं, अपमान करणं, स्त्रीत्वाचा अपमान करणं,
याविषयी आम्ही तक्रार केली आहे. 1153 अ समाजामध्ये शत्रुत्व पसरवणे महात्मा गांधी लोकशाही संविधान यांना मानणाऱ्या लोकांच्या संदर्भात भाव निर्माण करणं. 505 गुन्हेगारी स्वरूपाचा खोडसाळपणा करणं हे गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
यावेळी बोलताना तुषार गांधी म्हणाले की, “आक्षेपार्ह पद्धतीची वक्तव्यं करण्याची संभाजी भिंडे यांची हिंमत नाही. संभाजी भिंडे यांचा बोलविता धनी आरएसएस आणि नागपूर आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात एक आणि सभागृहाच्या बाहेर वेगळं बोलतात.
संभाजी भिंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी आम्ही तक्रारीत केली आहे. संभाजी भिंडे यांनी आमच्या कुटूंबातील महिलांचा अपमान केला आहे, असं ते म्हणाले.
संभाजी भिडे आणि त्याच्या कार्यक्रमाबाबत आम्ही तक्रार नोंदवली आहे. बापू हे पब्लिक फिगर आहेत त्याचवर टीका टीपण्णी होते. पण या माणसाने पुढे जाऊन बापूंच्या आई आणि वडिलांवर टीका केली आहे. आमचा विश्वास न्याय व्यवस्थेवर आहे, असंही तुषार गांधी म्हणाले.
संभाजी भिडे नेमकं काय म्हणाले…
संभाजी भिडे यांचा अमरावतीमध्ये बडनेरा मार्गावरील जय भारत मंगलम या सभागृहात कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमातील संभाजी भिडे यांची ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या क्लीपमध्ये संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह दावे केल्याचे ऐकायला मिळत आहे. मोहनदास हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते.
करमचंद हे ज्या मुस्लीम जमीनदाराकडे कामाला होते, त्याच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते. त्यामुळे त्या चिडलेल्या मुस्लीम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले, त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला.
तीन वर्ष करमचंद फरार होते, याचा काळात मोहनदास यांचा जन्मा झाला. त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र आहेत. मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लीम पालकाने केले असल्याचे सबळ पुरावे उपलब्ध असल्याचा दावाही यावेळी संभाजी भिडे यांनी केला.