लोकसभेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेच्या तिसऱ्या दिवशी लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. अधीर रंजन म्हणाले की, देशाचे प्रमुख या नात्याने पंतप्रधान मोदींनी मणिपूरच्या लोकांसमोर आपले विचार मांडायला हवे होते. आमच्याकडून होत असलेली मागणी चुकीची नव्हती. अधीर रंजन म्हणाले की, मोदींनी 100 वेळा देशाचे पंतप्रधान व्हावे, आम्हाला काही घेणे-देणे नाही. देशातील जनतेशी आमचे देणे-घेणे आहे. अधीर रंजन म्हणाले की, पंतप्रधान मोदी प्रत्येक गोष्टीत काहीतरी बोलतात पण मणिपूरवर ते गप्प आहेत. आम्हाला ते अजिबात आवडत नाही. मणिपूरमधून दोन खासदार आहेत. त्यांना बोलण्याची संधीही दिली जात नाही.
काँग्रेस खासदार अधीर रंजन यांनी भाषण सुरू केल्यानंतर काही वेळातच पंतप्रधान मोदीही लोकसभेत पोहोचले. यावर अधीर रंजन म्हणाले की, अविश्वास प्रस्तावाची ताकद बघा, आम्ही पंतप्रधान मोदींना खेचून सभागृहात आणले आहे. अधीर रंजन म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी मणिपूरवरील चर्चेत भाग घ्यावा अशी आमची इच्छा होती, परंतु त्यांनी काही अज्ञात कारणास्तव सभागृहात न येण्याची शपथ घेतली होती. अविश्वास प्रस्ताव आणण्याचा आम्ही यापूर्वी विचार केला नव्हता, परंतु आम्हाला असा प्रस्ताव आणावा लागला.
#WATCH | Parliamentary Affairs Minister Pralhad Joshi says “…Baseless allegation against the Prime Minister cannot be accepted. This should be expunged and he should apologise” https://t.co/F5sD2IW0Kj pic.twitter.com/NgKqfPtaNx
— ANI (@ANI) August 10, 2023
नीरव मोदीबद्दल तणाव –
अधीर रंजन यांनी नीरव मोदीचे नाव घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. यावरून लोकसभेत प्रचंड गदारोळ झाला. अधीर रंजन म्हणाले की, नीरव मोदी परदेशात फिरत राहतो, त्याचे फोटो येत राहतात, आम्हाला वाटले की नीरव मोदी परदेशात गेला आणि त्यानंतर नीरव मोदी नरेंद्र मोदींमध्ये दिसत आहेत.
#WATCH | Congress MP Adhir Ranjan Chowdhury says “The power of no-confidence motion has brought the Prime Minister in the Parliament today. None of us were thinking about this no-confidence motion. We were only demanding that PM Modi should come to the Parliament and speak on the… pic.twitter.com/LdxWcAuYsr
— ANI (@ANI) August 10, 2023
लोकसभेत गदारोळ
आपल्या भाषणात मणिपूरच्या घटनेचा संदर्भ देत अधीर रंजन म्हणाले की, जिथे राजा आंधळा असतो, तिथे द्रौपदीचे चीरहरण होत असते. अधीर रंजन यांच्या या वक्तव्यावर बराच गदारोळ झाला होता. गृहमंत्री अमित शहा यांच्या वतीने आक्षेपही घेण्यात आला.