नवी दिल्ली – कोरोनाची लागण देशभरात पसरत आहे. देशात कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची संख्या ही १६८ वर पोहोचली आहे. यावरून कोरोनाची व्याप्ती लक्षात येते, त्यामुळे आपली व आपल्या प्रियजनांची काळजी घ्या व या विषाणूंचा मुकाबला करा,असे आवाहन भारताची फुलराणी बॅडमिंटनपटू सायना नेहवालने भारतीय नागरिकांना केले आहे.
Let’s be cautious and stay at home . These next couple of weeks are an important phase for India . All of us need to learn from what the other countries have experienced and take the necessary precautions ASAP .#Coronaindia #CoronaPandemic https://t.co/NZmSFd7Y9Q
— Saina Nehwal (@NSaina) March 16, 2020
या संदर्भात ट्विट करताना सायनाने म्हटले आहे की, ‘कोरोनाशी आपण धीटपणे लढा दिला पाहिजे. विनाकारण अफवांवर विश्वास न ठेवता आपली व आपल्या प्रियजनांची काळजी घ्या व या विषाणूंचा मुकाबला करा. आपण सर्व एक होऊन तसेच अत्यंत गांभिर्याने काळजी घेतली तर कोणाचाही जीव जाणार नाही. पुढील 15 दिवस सगळ्यांसाठीच महत्त्वाचे आहेत, कोरोनाचा निपटारा निश्चितच होईल मात्र त्यासाठी इतर देशांनी याचा सामना कसा केला ते पाहून आपणही जागरूक होणे गरजेचे आहे’, अशा शब्दात सायना नेहवालने आवाहन केले आहे.