मुंबई / Rutuja Latake wins Andheri by-elections – अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकांचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकीत शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना मतदारांनी कौल दिला आहे. निवडणुकांपूर्वी अंधेरीच्या जागेसाठी हाय व्होल्टेज राजकीय ड्रामा रंगला होता. भाजप उमेदवार मुरजी पटेल यांनी पक्षनेतृत्वाने दिलेल्या आदेशांप्रमाणे अर्ज मागे घेतल्याने ऋतुजा लटके यांचाच विजय होणार हे स्पष्ट होते. आज त्यावर शिक्क्कामोर्तब झाले. विजयानंतर लटके यांनी मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी विजयी उमेदवार लटके यांच्यासह ठाकरे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ‘मशाल भडकली आणि भगवा फडकला’ आशा शब्दांत ठाकरे यांनी लटके यांच्या विजयाचा आनंद व्यक्त केला. यावेळी त्यांनी भाजप उमेदवाराची माघार, शिंदे गट यांच्यावर चौफेर टीका केली.
मशाल भडकली असून भगवा फडकला | Rutuja Latake wins Andheri by-elections
शिंदे गटाच्या बंडानंतर अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूक ही पहिली मोठी निवडणूक होती. यानंतर शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे धाव घेत पक्षाचे नाव चिन्हवर दावा केला होता. दोन्ही गटांकडून दावे करण्यात आल्याने शिवसेना हे नाव व धनुष्यबाण निवडणूक चिन्ह आयोगाने गोठले होते. यावर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “कपट कारस्थानानंतर पहिली पोटनिवडणूक झाली. आमचं चिन्ह आणि नाव गोठवलं गेलं. मशाल चिन्ह घेऊन आम्ही निवडणूक लढलो. ही मशाल भडकली असून भगवा फडकला आहे याचा मला अभिमान आणि आनंद आहे.”
त्या सर्वांचे आभार
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेनेला राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्यासह इतरही पक्षांनी पाठिंबा दिला होता त्यांचे आभार मानताना, “या विजयाचं श्रेय शिवसैनिकांसह आमच्यासोबत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित, कम्युनिस्ट पक्ष, संभाजी ब्रिगेड आणि हितचिंतकांचं आहे. त्या सर्वांचे मी आभार मानतो,” लढाईची सुरुवातच विजयाने झाली असून भविष्यातील लढाईची आता मला चिंता नाही. या निवडणुकीत ज्याप्रमाणे एकजुटीने हा विजय खेचून आणला, त्याचप्रमाणे यापुढेही विजय एकत्र मिळून खेचून आणू” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
अंदाज आल्यानंतर माघार | Rutuja Latake wins Andheri by-elections
विजयी उमेदवार ऋतुजा लटके यांच्यानंतर नोटाला दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली आहेत. याबाबत उद्धव ठाकरेंना विचारण्यात आले असता त्यांनी, “आमचं नाव आणि चिन्ह गोठवलं होतं. ज्यांच्या मागणीवरुन गोठवलं ते या निवडणुकीच्या रिंगणात आजुबाजूलाही नव्हते. मात्र त्यांच्या पाठीशी असणाऱ्यांनी प्रथम अर्ज भरला. पण अंदाज आल्यानंतर माघार घेतली. जर त्यांनी त्यांच्या चिन्हावर निवडणूक निवडणूक लढवली असतील तर ही मतं त्यांना मिळाली असती. नोटाच्या मागे काय गुपित आहे हे सर्वांनाच माहिती आहे.” असा टोला लगावला.