मेलबर्न : सूर्यकमार यादव आणि केल राहूल यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावार टीम इंडियाने झिम्बाब्वेसमोर 187 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकांत 5 गडी गमावून 186 धावा केल्या आहेत.
केएल राहुलने सुरूवातीला तर सूर्यकुमार यादवने शेवटच्या षटकांत चांगली खेळी केली. दोघांनाही अर्धशतके झळकावली. राहुल 35 चेंडूत 51 धावा करून बाद झाला. त्याचबरोबर सूर्यकुमारने 25 चेंडूत 61 धावांची नाबाद खेळी केली. दोन्ही फलंदाजांनी अखेरच्या षटकांत अविश्वसनीय फटकेबाजी केली. सूर्यकुमारने आपल्या खेळीत सहा चौकार आणि चार षटकार मारले.
Innings Break!
Half-centuries from @surya_14kumar (61*) & @klrahul (51) as #TeamIndia post a total of 186/5 on the board.
Scorecard – https://t.co/lWOa4COtk9 #INDvZIM #T20WorldCup pic.twitter.com/XxXJ4FMxyk
— BCCI (@BCCI) November 6, 2022
याव्यतिरिक्त कर्णधार रोहित शर्माने 13 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 15 धावा तर कोहलीने 25 चेंडूत 26 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत दोन चौकार मारले. तर यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत पाच चेंडूत फक्त तीन धावा करून बाद झाला. हार्दिक पंड्याने 18 चेंडूत 18 धावांची खेळी केली.
झिम्बाब्वेकडून गोलंदाजीत शॉन विलियम्सने 2 षटकांत 9 धावा देताना सर्वाधिक 2 गडी बाद केले तर ब्लेसिंग मुजरबानी,रिचर्ड एनगरवा आणि सिकंदर रजा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
दरम्यान,भारतीय संघ आधीच उपांत्य फेरीत पोहोचला आहे. भारतीय संघाचे चार सामन्यांत सहा गुण आहेत. झिम्बाब्वेविरुद्ध विजय मिळविल्यानंतर, सुपर-12 मध्ये भारतीय संघ अव्वलस्थानी राहिल.