पुट्टपर्थी, (आंध्रप्रदेश) – राज्यकर्त्यांनी आपण घेतलेले निर्णय उत्तम आहेत, याचे आत्मपरीक्षण रोज केले पाहिजे. आपल्यात कोणते दुर्गण नाहीत ना हेही त्यांनी तपासले पाहिजे, असे मत देशाचे सरन्यायाधिश एन. व्ही. रमणा यांनी सोमवारी व्यक्त केले.
श्री सत्य साई इन्स्टिट्यूट ऑफ हायर लर्निंगच्या 40 व्या पदवीदान समारंभात ते येथे बोलत होते. रामायण आणि महाभारताचा उल्लेख करत त्यांनी राज्यकर्त्यांनी 14 वाईट सवयी टाळल्या पाहिजेत, असे सांगितले.
आपले काम सुरू करण्यापुर्वी लोकशाही राज्यातील सर्व राज्यकर्त्यांनी आपल्यात काही दुर्गूण आहेत का हे तपासले पाहिजे. नागरिकांच्या गरजांनुसार प्रशासन चालवण्याची आवश्यकता ाहे. येथे अनेक बुध्दीमान माणसे आहेत. ते जगाचा आणि देशाचा विकास पहात असतात, असे सांगून रमणा म्हणाले, आधुनिक शिक्षण पध्दती केवळ ीशक्षणाच्या उपयुक्ततेवरच प्रकाशझोत टाकते. अशा पध्दतीत नैतिक अथवा शिक्षणाच्या अध्यात्मिक कार्यशैलीद्वारे विद्यार्थ्यांचे चारित्र्य घडवले जात नाही आणि त्यांच्यात सामजिक भान आणि जबाबादारीची जाणीव निर्माण होत नाही.
पररस्रांविषयी आदर, क्षमाशीलता, करूना सहिष्णुता, नि:स्वार्थीपणा, शिस्त आणि मानवता हे गुण जे आणि मुल्ये रुजवते तेच खरे शिक्षण आहे, असे त्यांनी सांगितले.