मुंबई : सत्ताधारी हे सध्या अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर सडकून टीका करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी देखील मुख्यमनातरी आणि भाजपवर सडकून टीका केली आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर असलेल्या लोकांना आम्हीच अयोध्येला घेऊन गेलो होते. सत्यवचनी प्रभू श्रीरामच्या दर्शनाला अयोध्येत जाणे हा एक आनंद असतो. पण, रामाचे सत्यवचन तुम्ही कोठून घेणार आहात? जेव्हा पक्ष सोडला, बेईमानी केली सुरत आणि गुवाहाटील दर्शनासाठी गेला. तेव्हा रामाची आठवण झाली नाही, अशी टीका राऊत यांनी शिंदे गटावर केली आहे.
माध्यम प्रतिनिधींशी बोलताना संजय राऊत यांनी, “गुवाहाटीच्याऐवजी अयोध्येत जाऊन प्रभू श्री रामाला कौल लावला असता, तर असत्याच्या बाजूने कौल दिला नसता. कारण, प्रभू श्रीरामाची लढाई ही रावणविरोधात होती,” असे म्हटले.
#WATCH | Mumbai: We also believe in Lord Ram. We have also gone to Ayodhya several times. But BJP never came with our party. When Babri incident happened they ran away…Farmers in Maharashtra are in problems due to rain and hailstorm but ignoring all these issues the govt of the… pic.twitter.com/kv9NZC2tEk
— ANI (@ANI) April 9, 2023
तसेच “महाराष्ट्रात गेल्या ७२ तासांत अवकाळी आणि गारपीटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र येथे हाहाकार उडाला आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून हे सरकार धर्माच्या नावावर पर्यटनाला निघाले आहे. प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद यांना मिळणार नाही,” असे टीकास्र संजय राऊतांनी सोडले आहे.
“धर्माच्या नावावर जे चालले आहे, आम्ही त्याच्या विरोधात नाही आहोत. आम्हीही अनेकवेळा अयोध्येला गेलो आहे. पण, भाजपाचे लोक कधी आमच्याबरोबर अयोध्येला आले नाही. बाबरी मशिद पडली तेव्हा भाजपावाले आम्हाला सोडून पळून गेले होते. आता गद्दारांचे बोट धरून अयोध्येला गेले आहेत,” असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला आहे.