Lok Sabha Election 2024 | यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत ‘400 पार’ चा नारा दिला आहे. त्यादृष्टीने देशभरात भाजप पक्ष कामाला लागला आहे.
मात्र यापूर्वी काँग्रेसने 1984 मध्ये 400 पेक्षा अधिक जागा जिंकल्या होत्या. भारतातील लोकसभा निवडणुकीतील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय होता. । Lok Sabha Election 2024
इंदिरा गांधींच्या हत्येनंतर 1984 च्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. अशा परिस्थितीत देशात राजीव गांधी आणि काँग्रेसबद्दल सहानुभूतीची मोठी लाट उसळली होती. या लाटेचा परिणाम म्हणजे काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला. काँग्रेसने 514 पैकी 404 जागा जिंकल्या होत्या.
यंदा देशात एप्रिल आणि मे मध्ये सात टप्प्यात निवडणुका होणार आहेत. 1 जूनपर्यंत या निवडणुका चालतील. तर 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे देशातील लोकशाहीच्या या सर्वोच्च उत्सवाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेत कायम ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं हालचाली सुरू केल्या आहेत. संघ आणि संघ परिवारातील तब्बल ३६ संघटना भाजपसाठी कामाला लागल्या आहेत.
‘आपले मतदार सकाळी 11 पर्यंत मतदान पूर्ण करतील या दृष्टीनं प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी यंत्रणा सक्रिय करा’, असे आदेश राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि परिवारातील 36 संघटनांच्या बैठकांमधून देण्यात आले आहेत. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात एकाच दिवशी प्रत्येक जिल्ह्याच्या बैठका झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
यानंतर तालुकास्तरीय बैठका घेण्यात आल्या. जिल्हा बैठकांना संघाच्या त्या-त्या ठिकाणचे जिल्हा संघचालक हजर होते. परिवारातील संघटनांचे प्रमुख पदाधिकारी आणि भाजपचे निवडक नेतेही बैठकांना उपस्थित होते.
आपल्या परंपरागत उमेदवारांचं मतदान सकाळी 11 पर्यंत आटोपलं पाहिजे, अशा सूचना बैठकांमध्ये देण्यात आल्या. सध्या भाजप कडून बैठकांचा सपाटा लावण्यात आला आहे. । Lok Sabha Election 2024