जर आपलं ध्येय निश्चित असेल तर त्यात कितीही संकटे आली तरी आपल्याला त्यातून निघण्याचा मार्ग सापडतोच. अशाच प्रकारे इस्रोने आणखी नवीन ध्येयाकडे आपली वाटचाल केली आहे. देश चांद्रयान मिशनच्या आनंदात रमलेला आहे आणि इस्रो आपल्या गगनयान मिशनकडे वळलेला आहे त्यामागचा उद्देश्य काय हे जाणून घेऊया. एका नव्या अंदाजात.
सुबोध : इस्रोने केलेल्या 21 ऑक्टोबरच्या चाचणीत उशीर झाला व नंतर तो ब्लास्ट झाला. अरे! अरे! पुन्हा अपयश ऐकल का सर्वांनी. काय ती नवीन भानगड यात काय म्हणून आहे तुझं मीना?
मीना : अरे हो, मला याबद्दल माहिती आहे. काही अपयश नाही मिळालं इस्रोला. उलट त्याला यश मिळालं.
सुबोध : म्हणजे? मला काही कळलं नाही थोडं समजवशील मला?
मीना : तुलाच का मी सगळ्याना समजवणार. आधी हे लक्ष्यात घेणे आवश्यक आहे की इस्रोने केलेली चाचणी ही गगनयान मिशनचा एक भाग आहे जे एक हुमन स्पेस मिशन आहे. ज्या माध्यमाने भारत मानवाला अंतराळात पाठवणार आहे आणि जर ते यशस्वी झालं तर भारत स्वतःच स्पेस स्टेशन तयार करणार आहे आणि त्याकरिता इस्रो येणाऱ्या काही महिन्यांत अशाच टेस्ट करणार आहे. पहिली चाचणी ही 21ऑक्टोबरला करण्यात आली. तुला याचं नाव माहिती आहे?
सुबोध : मी जर बरोबर असेन तर कदाचित या टेस्टचं नाव रॉकेटवर लिहिलं आहे.
मीना : अगदी बरोबर सुबोध, या मिशनकरिता होणाऱ्या टेस्टच नाव जीएसएलव्ही मार्क 3 (एलव्हीएम3) भारताच्या बाहुबली रॉकेटवर नमूद केले आहे टीव्ही-डी1 ज्याचं पूर्णनाव टेस्ट व्हेइकल डेव्हलपमेंट1 असं आहे. ही टेस्ट क्रू मॉड्युलकरिता करण्यात आली. ज्याला पृथ्वीपासून साडेसोळा किलोमीटर वर नेण्यात आलं आणि मग बंगालच्या खाडीत त्याला उतरवलं जिथे नेव्हीचे जवान आधीच तैनात होते.
सुबोध : हे क्रू मॉड्युल काय सांगशील तर बरं होईल.
मीना : हो, क्रू मॉड्युल हे एक केबिन आहे ज्यात अंतराळवीर (अस्ट्रोनट) बसून जाणार व अंतराळात राहणार जे की पृथ्वीपासून 400 किलोमीटर अंतरावर राहून पृथ्वीच्या भोवती 7 दिवस चक्कर लावणार आहे आणि त्यावेळी आपले 3 अंतराळवीर आपल्याला उपयुक्त अशी माहिती देणार.
सुबोध : मग इस्रोने ही टेस्ट का केली? चांद्रयान मिशनसारखं सरळ अंतराळवीरांना पाठवायला हवं होतं.
मीना : नाही सुबोध, जर असं काही झालं असतं व क्रू मॉड्युल किंवा रॉकेट अंतराळात जाण्याआधी ब्लास्ट म्हणजेच त्याचा विस्फोट झाला असता तर आपल्या अंतराळवीरांचा जीव जाऊ शकतो आणि आपल्याला फक्त अंतराळात जाणे नाही तर सुखरूप परतसुद्धा येणे आहे. त्यामुळे इस्रोने ही अबोर्ड टेस्ट केली ज्यात सुरुवातीलाच रॉकेट उडण्याआधी 5 मिनिटआधी समस्या निर्माण करण्यात आली.जेणेकरून जर एखाद्या वेळी काही झालं तर त्यात सुधारणा करता आली पाहिजे आणि इस्रोने त्या बिघडाला 1 तासाच्या आत सुधारलं.सुधारणा केल्यानंतर रॉकेट लॉन्च करण्यात आलं जे ध्वनीच्या वेगाने अंतराळात जाऊ लागलं.
11.9 किलोमीटर अंतरावर रॉकेट जाताच इस्रो वैज्ञानिकांमार्फत त्याचा विस्फोट करण्यात आला आणि रॉकेटपासून बूस्टर रॉकेट वेगळं झालं. ते दोघं वेगळे होताच क्रू एस्कॅप सिस्टीम ऍक्टिव झालं जे क्रू मॉड्युला 11.9 किलोमीटरवरून 16.9 किलोमीटर अंतरावर घेऊन गेला. जसं रॉकेट 16.9 किलोमीटर अंतरावर पोहचलं तसंच क्रू एस्कॅप सिस्टीमपासून क्रू मॉड्युल वेगळं झालं व त्याला बंगालच्या खाडीत पाडण्यात आलं जिथे त्याला नेव्ही सैनिकांद्वारे इस्रोला परत करण्यात आलं.
सुबोध : वाह! काय मस्त योजना आहे इस्रोची, अशा टेस्ट करून इस्रो मानवाला अंतराळात पाठवणार, फार मस्त.
मीना : हो, पण मानवाआधी इस्रो व्योममित्र जो की रोबोट आहे त्याला आधी पाठवणार. त्याच्यावर अंतराळात काय प्रतिक्रिया होते ते बघणार आणि त्याला परत आणणार तेव्हा कुठे इस्रो मानवाला अंतराळात पाठवणार.
सुबोध : ओ! यात तर फार वेळ जाणार. म्हणजे काय इस्रो टेस्टवर टेस्ट करणार?
मीना : हो, इस्रो सर्व पळताळणी करूनच मानवाला जे भारतीय सैन्यातील सैनिक आहेत त्यांना पाठवणार आहे आणि जर या गगनयानला यश मिळालं व भारताचं स्पेस स्टेशन तयार झालं तर अमेरिका, रशिया व चीननंतर भारत चौथा देश बनेल ज्याचं स्वतःचं स्पेस स्टेशन असेल.
सुबोध : आणि त्याची उत्कुता आता मात्र सर्वांना लागली आहे.
मीना : हो नक्कीच.
– मेघा चेटुले