Robert Vadra । काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाची साथ सोडणाऱ्या नेत्यांवर नाराजी व्यक्त केली. त्यांनी याविषयी बोलताना, असे नेते सत्ता आणि पदाच्या मागे धावत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना रॉबर्ट वाड्रा यांनी लोकसभा निवडणुकीसह अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.
रॉबर्ट वाड्रा यांनी बोलताना,” पक्ष सोडणाऱ्यांनी काँग्रेसवर विश्वास नाही असे म्हणणे योग्य नाही. मला पक्षतील अनके ज्येष्ठ अनुभवी लोक भेटले आहेत त्यांचे चांगले अनुभव सांगितले. पण सध्या त्याच नेत्यांना सत्ता हवी, तिकीट किंवा जागा हवी, असे वाटत असले तरी ते त्यासाठी प्रयत्न करत नाहीत. असेही त्यांनी म्हटले.
‘पक्ष सोडणाऱ्यांवर आमचा राग नाही’ Robert Vadra ।
वाड्रा पुढे म्हणाले, काँग्रेस हा एक वारसा आहे, काँग्रेसने त्यांना खूप काही दिले आहे, त्यांच्यासाठी, त्यांच्या कुटुंबासाठी खूप काही केले आहे. पिढ्यानपिढ्या काँग्रेससोबत असताना त्यांना अडचण वाटली पण त्यांनी थोडा धीर धरायला हवा. सत्ता ही सर्वस्व नाही. आम्ही त्यांच्यावर रागावलो नाही, आम्ही त्यांना चांगल्या भविष्यासाठी पाठवतो. पण लोकांना दिसेल आणि लक्षात येईल की कोणत्याही विशिष्ट पक्षाच्या विचारसरणीने त्यांना काही फरक पडत नाही, उलट ते जिथे सत्ता किंवा पद मिळेल तिथे जातात. त्यांच्यासाठी केवळ पद महत्त्वाचे आहे.
‘स्मृती निवडून चूक झाली असं अमेठीतील लोक म्हणतात’ Robert Vadra ।
वाड्रा यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, त्या अमेठीत कधीच उपलब्ध नसतात. त्यामुळे लोकांना असे वाटते की त्यांना (स्मृती) निवडून त्यांनी चूक केली आहे. स्मृती इराणी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत नेहरू-गांधी परिवाराचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीमधून काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पराभव केला होता. त्यावेळच्या सार्वत्रिक निवडणुकीतील हा सर्वात मोठा अपसेट होता.