बंगळुरू :- आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) सराव करत होता. त्यावेळी भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतनेही उपस्थिती लावली होती.
अर्थात श्रीलंकेला रवाना होणाऱ्या संघात पंतचा समावेश नसला तरीही त्याने भारतीय क्रिकेटपटूंना भेटण्यासाठीच येथे उपस्थिती लावली होती.
दरम्यान, हा सराव मंगळवारी संपला असून या स्पर्धेसाठी भारतीय संघ श्रीलंकेत दाखल झाला आहे. सरावात पंतनेही काही चेंडूंचा सामना करत फलंदाजीचा आनंद लुटला.
दरम्यान, यजमान पाकिस्तान व नवोदित नेपाळ यांच्यातील सलामीच्या लढतीद्वारे यंदाच्या आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेला 30 ऑगस्टपासून प्रारंभ होत आहे. ही स्पर्धा यंदा एकदिवसीय सामन्यांच्या रचनेनूसार हायब्रीड पद्धतीने खेळवण्यात येणार आहे. राजकीय तणावामुळे भारतीय संघ पाकिस्तानमध्ये जाऊ शकणार नसल्याने भारताचे सर्व सामने श्रीलंकेतच होणार आहेत.