Bacchu kadu – गेल्या दोन दिवसा आधी अजित पवार यांनी गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत अचानक भेट घेतली. तर नाराजीमुळे अजितदादांनी ही भेट घेतली असून निधीवाटपावरून तक्रार केल्याची माहिती आहे. ४५ मिनिटांत झालेल्या भेटीमध्ये विकासनिधीवरून महायुतीत नाराजी नाट्य सुरू झाल्याचं कळतंय.
विकासनिधीवरून समानता नाही, अशी अजित पवार यांनी शाहांकडे तक्रार केल्याची माहिती आहे. यावरून आता राज्यातील राजकारण तापले आहे. विरोधीपक्षातील नेत्यांसह शिंदे गटातील नेतेही या मुद्यावरून प्रतिक्रिया देतांना दिसत आहे. या मुद्द्यावरून आता बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यमांशी बोलतांना बच्चू कडू म्हणाले, ‘अर्थमंत्री अजित पवार यांच्या गटाला निधी मिळत नसल्याचा आरोप हास्यास्पद आहे.अजित पवारच अर्थमंत्री आहेत, त्यांच्या हाती तिजोरी आहे आणि त्यांनीच म्हणवं निधीच मिळत नाही, हा आरोप कितपत योग्य आहे? असा सवाल बच्चू कडू यांनी केला आहे.