नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निसर्ग वादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मंगळवारी आढावा घेतला. हे वादळ बुधवारी देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे.
मी देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर येणाऱ्या वादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे. सर्वांच्या कल्याणासाठी मी प्रार्थना करत आहे. लोकांनी सुरक्षिततेचे सर्व नियम पाळावेत आणि शक्य ती सर्व काळजी घ्यावी, असे आवाहन मी करत आहे, असे ट्विट त्यांनी केले आहे.
दरम्यान, मुंबई आणि उपनगरे, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात अतीसतर्कतेचा आदेस देण्यात आला आहे. या काळात मदतकार्य करताना करोनाच्या पार्श्वभूमीवर घ्यावयाची सावधानता सांभाळण्यात येत आहे. एनडीआरएफच्या 16 पथकांपैकी 10 पथके मदत कार्यासाठी तैनात करण्यात येणार असून अन्य पथके राखीव ठेवण्यात येणार आहेत. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची सहा पथकेही मदत कार्यासाठी राखीव असतील