पवनानगर – मुसळधार पावसामुळे गडकिल्ले गिर्यारोहण मार्ग व पर्यटनस्थळांवरील संभाव्य अपघातांचा धोका लक्षात घेऊन 14 ते 17 जुलै मध्यरात्रीपर्यंत पर्यटनस्थळी बंदी घालण्यात आली आहे. याकरिता कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. पोलिसांच्या नाकाबंदीमुळे याचा परिणाम दिसून आला असून, पर्यटकांची संख्या कमी झाल्याचे चित्र मावळ तालुक्यात पहायला मिळाले.
सध्या सुरू असलेली अतिवृष्टी लक्षात घेता पर्यटनस्थळावर जमावबंदीचे कलम 144 लागू केले आहे. त्यापार्श्वभूमीवर लोणावळा शहरातून भुशी धरण, लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट, घुबड तलाव याकडे जाणाऱ्या मार्गावर लोणावळा पोलिसांकडून कडक नाकाबंदी लावण्यात आली आहे. केवळ त्याभागात राहणाऱ्या स्थानिक रहिवाशांना तसेच ज्यांचे बंगले आणि हॉटेलचे बुकिंग झालेलं आहे त्यांनाच या मार्गाने सोडण्यात येत आहे. मात्र तत्पूर्वी त्यांचं बुकिंग तपासण्यात येत आहे.
या सर्व घडामोडींचा परिणाम पर्यटनावर झालेला पहायला मिळाला. पवन मावळ परिसरात पर्यटकांची तुरळक गर्दी पहायला मिळाली. तर मावळ परिसरात पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतल्याने नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसंपासून राज्यभरासह पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यातच हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसामुळे मावळातील धरणे, धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत. तर वर्षभरात पावसाळ्यात मावळ तालुक्यात पर्यटनाच्या माध्यमातून कोट्यवधी रूपयांची उलाढाल होत असते.
रोजगाराला मोठा फटका
लोणावळ्यात विकेंडला पर्यटक मोठी गर्दी करत असतात. मात्र. जिल्हा प्रशासनाने लागू केलेला प्रतिबंधात्मक आदेश रविवारी (दि. 17) मध्यरात्री बारा वाजेपर्यंत लागू करण्यात आला आहे. त्यामुळे 14 ते 17 या कालावधीत पर्यटकांची संख्या घटल्याने मावळातील मका कणसि विक्रेते, चहा टपरी व खाद्यपदार्थ विक्रत्यांना याचा मोठा फटका बसला आहे. याकाळात आर्थिक उलाढालीवर मोठा परिणाम झाल्याचे पहायला मिळाले.
मावळातील गजबजाट ओसरला
पावसाळ्यात पर्यटकांसाठी मावळ तालुका हा पर्वणी मानला जातो. लोणावळा, खंडाळ्यासह आंदर, नाणे व पवन मावळात पर्यटक मोठी गर्दी करत असतात. मात्र चार दिवस लागू केलेल्या प्रतिबंधक आदेशामुळे मावळातील या तीनही भागांतील पर्यटकांची गजबजाट ओसरला आहे.
रोजगाराला मोठा फटका
लोणावळ्यात विकेंडला पर्यटक मोठी गर्दी करत असतात. मात्र. जिल्हा प्रशासनाने लागू केलेला प्रतिबंधात्मक आदेश रविवारी (दि. 17) मध्यरात्री बारा वाजेपर्यंत लागू करण्यात आला आहे. त्यामुळे 14 ते 17 या कालावधीत पर्यटकांची संख्या घटल्याने मावळातील मका कणसि विक्रेते, चहा टपरी व खाद्यपदार्थ विक्रत्यांना याचा मोठा फटका बसला आहे. याकाळात आर्थिक उलाढालीवर मोठा परिणाम झाल्याचे पहायला मिळाले.