राजकोट – सौरभ कुमार व शम्स मुलाणी यांच्या भेदक गोलंदाजीसमोर सौराष्ट्रची दुसऱ्या डावात सर्वबाद 79 अशी दयनिय स्थिती झाली व इराणी करंडक स्पर्धेत शेष भारत संघाने विजेतेपद पटकावले. हा सामना अवघ्या तीन दिवसांतच संपला.
शेष भारताने पहिल्या डावात केलेल्या 308 धावांचा पाठलाग करताना सौराष्ट्रचा पहिला डाव अवघ्या 214 धावांवर संपला व शेष भारताने 94 धावांची महत्वपूर्ण आघाडी घेतली. त्यानंतर सौराष्ट्राच्या गोलंदाजीसमोर शेष भारताचा दुसरा डाव 160 धावांवर संपला. आता सौराष्ट्रसमोर विजयासाठी 254 धावा करण्याचे आव्हान निर्माण झाले. याचा पाठलाग करताना सौराष्ट्रच्या फलंदाजांनी हाराकीरी केली. सौरभ कुमार व शम्स मुलाणी यांच्या भेदक गोलंदाजीसमोर त्यांचे एकेक फलंदाज हतबल ठरले. त्यांच्या धर्मेंद्रसिंह जडेजाने थोडीफार चमक दाखवली मात्र, त्याला समोरुन अन्य कोणत्याही फलंदाजाने साथ दिली नाही व त्यांचा दुसरा डाव घसरला.
VICTORY FOR REST OF INDIA 👏👏
They beat Saurashtra by 175 runs to lift the @IDFCFIRSTBank #IraniCup in Rajkot
Fantastic performance from the Hanuma Vihari-led unit 🙌🏻
Scorecard ▶️ https://t.co/5POUwwFtMc pic.twitter.com/KGj5N1VVyk
— BCCI Domestic (@BCCIdomestic) October 3, 2023
जडेजाच्या साथीत खेळताना जयदेव उनाडकटने 9 धावा करत 28 धावांची भागीदारी केली मात्र, ते संघाचा पराभव टाळू शकले नाहीत. हा सामना शेष भारत संघाने 175 धावांनी जिंकला व इराणी करंडकावर नाव कोरले.
संक्षिप्त धावफलक – शेष भारत पहिला डाव – सर्वबाद 308 धावा. सौराष्ट्र पहिला डाव – सर्वबाद 214 धावा. शेष भारत दुसरा डाव – 52 षटकांत सर्वबाद 160 धावा. (मयंक आग्रवाल 49, साई सुदर्शन 43, पार्थ भूट 7-53, धर्मेंद्रसिंह जडेजा 3-65). सौराष्ट्र दुसरा डाव – 34.3 षटकांत सर्वबाद 79, धर्मेंद्रसिंह जडेजा 21, सौरभ कुमार 6-43, शम्स मुलाणी 3-22).