शेतकरी संघटनेचे शिरूर तहसीलदारांना निवेदन
शिरूर (प्रतिनिधी) – शिरूर तालुक्यात उन्हाळी हंगाम दुष्काळामुळे, तर खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे वाया गेला. यामुळे शिरूर तालुक्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला मदतीचा हात म्हणून महाराष्ट्राच्या सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब घाडगे यांनी केली आहे. याबाबतचे पत्र तहसीलदार लैला शेख यांना शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आले. आहे.
यावेळी शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष बाळासाहेब घाडगे, तालुकाध्यक्ष बापुसाहेब शिवले, उपाध्यक्ष दत्तात्रय भुजबळ, बाबासाहेब थिटे, गणेश महाराज फडतरे, भागीनाथ फंड, प्रल्हाद रंनसुरे, भाऊसाहेब गावडे, रमदास मचाले, राजेंद्र चव्हाण, तुषार भगत, आदि उपस्थित होते. सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, अशी मागणी यावेळी केली आहे.