आमदार अशोक पवार यांनी लक्ष घातल्याने शेतकरी समाधानी
न्हावरे -चिंचणी (ता. शिरूर) येथील घोड धरणाच्या उजव्या कालव्याची मुख्य वितरिका-1 व त्यावरील चार उपवितरिका दुरुस्तीसाठी शिरूर – हवेलीचे आमदार ऍड. अशोक पवार यांनी विशेष प्रयत्न केल्यामुळे व संबंधित विभागाने तातडीने नादुरुस्त उपवितरिका दुरुस्त केल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
घोड धरणावरील उजव्या कालव्याच्या मुख्य वितरिका-1 वरील एस1, एस2, एस3, एस4 या उपवितरिका गेल्या दहा वर्षांपासून नादुरुस्त होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी पूर्ण क्षमतेने पाणी मिळत नव्हते. अशा तक्रारी शेतकरी वेळोवेळी करत होते. त्याचीच दखल घेऊन आमदार पवार यांनी संबंधित विभागाला उपवितरिका दुरुस्त करण्यासाठी सूचना केल्या होत्या. त्यानुसार संबंधित विभागाने तातडीने उपवितरिकांची दुरुस्ती केली. त्यासाठी आमदार पवारांनी पाठपुरावा करून वितरिका दुरुस्तीसाठी पोकलेन व जेसीबी मशिन्स पाटबंधारे विभागाकडून उपलब्ध करून दिल्या.
वितरिका दुरुस्तीमुळे शिरूरच्या पूर्व भागातील घोड उजव्या कालव्यावर अवलंबून असलेल्या हजारो एकर क्षेत्राला पूर्ण क्षमतेने पाणी मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच पूर्व भागातील अर्थकारण हे शेतीवर अवलंबून असून सर्वाधिक क्षेत्र हे बागायती शेतीखाली आहे. त्यामुळेच शिरूर-हवेलीचे आमदार ऍड. अशोक पवार यांनी विशेष बाब म्हणून या कालव्याची तात्काळ दुरुस्ती करण्याच्या सूचना देऊन तातडीने दुरुस्ती व्हावी.
यासाठी विशेष प्रयत्न केले. दुरुस्त वितरिकांची पाहणी लाभधारक शेतकऱ्यांसमवेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष व घोडगंगा कारखान्याचे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब फराटे, संचालक शंकरराव फराटे, दत्तात्रय फराटे, मांडवगणचे सरपंच शिवाजी कदम, निखिल थोरात, गणेश लगड, राजेंद्र जगताप, बाळू उदमले यांनी केली.