कोपरगाव – कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक 3 मधील श्री साईबाबा मंदिर ते ठक्कर घर बाजार तळ रस्ता व श्री संत ज्ञानेश्वर स्कुल ते शेखर कोलते घर बाजारतळ रस्ता या रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली असून या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरु करावे, असे निवेदन आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना देण्यात आले.
निवेदनात असे म्हटले आहे की, रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना व लहान मुलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याचे काम सुरु करून नागरिकांना होत असलेल्या त्रासातून मुक्तता करावी.
यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, माजी नगरसेवक रमेश गवळी, मनोज नरोडे, संतोष शेजवळ, फिरोज पठाण, अंकुश देशमुख, सुवर्णा भडकवाडे, नीलम बोऱ्हाडे, डॉ.अक्षय दगडे, कमला दगडे, शुभम राऊत, अनिल राऊत, रविंद्र राऊत, शारदा राऊत, रंजना गवळी, पूजा राऊत, सारिका नागरे, शोभा महापुरे, लीला क्षीरसागर आदी उपस्थित होते.