मुंबई – महाराष्ट्र सरकारने आपल्या सह 16 बंडखोर आमदारांच्या घरांना दिलेले पोलिस संरक्षण काढून घेतले आहे असा आरोप बंडखोर शिवसेना नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.
राज्य सरकारने राजकीय सूड बुद्धीने ही कारवाई केल्याचे त्यांनी म्हटले आहे. शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना उद्देशून 16 आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र ट्विट केले आहे. पत्रात आमदारांनी म्हटले आहे की, त्यांच्या कुटुंबीयांना काही इजा झाल्यास मुख्यमंत्री ठाकरे आणि सत्ताधारी महाविकास आघाडी (एमव्हीए) आघाडीचे नेते जबाबदार असतील.
या आमदारांच्या घरांच्या व कुटुंबियांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. या आमदारांच्या घरांना प्रोटोकॉल आधारे देण्यात आलेले संरक्षण काढून घेण्याची कृती बेकायदेशीर आहे असेही त्यांचे म्हणणे आहे.