नगर -चित्रपट अभिनेत्री रवीना टंडन, फराह खान व भारती सिंह या तिघांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात एका समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपावरुन डिसेंबर 2019 मध्ये फिर्याद दाखल करण्यात आली होती. दरम्यान, ही फिर्याद तोफखाना पोलिसांनी मुंबईतील मालाड पोलीस ठाण्याकडे वर्ग केली होती. परंतु, त्यांनी तपास करण्यास नकार दिल्याने या गुन्ह्याचा तपास पुन्हा नगरमधील तोफखाना पोलिसांकडे आला आहे. मालाड पोलिसांकडून दाखल फिर्याद परत आल्याने तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
दूरचित्रवाहिनीवरील कार्यक्रमात अभिनेत्री रवीना टंडन, फराह खान, भारती सिंह यांनी एका समाजाबद्दल अपशब्द उच्चारल्याचा आरोप आहे. त्यातून समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यावरुन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. नगरमधील एका व्यक्तीने त्यासाठी पुढे येऊन फिर्याद दिली होती. त्यावरुन तोफखाना पोलिस ठाण्यात डिसेंबर 2019 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पुढील तपासकामी हा गुन्हा मुंबईतील मालाड पोलीस ठाण्याकडे वर्गही करण्यात आला होता. तथापि, परंतु, नगरमधील समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या तर या गुन्ह्याचा तपास त्यांनीच करावा, अशी भूमिका मालाड पोलिसांनी घेतली. त्यामुळे मालाड पोलिसांकडे पाठविलेली फिर्याद पुन्हा तोफखाना पोलिसांकडेच पोचली. नगरमधील तोफखाना पोलिसांकडून या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हारुण मुलाणी या गुन्ह्याचा तपास करत आहेत.
डिसेंबर 2019 मध्ये अभिनेत्री रविना टंडन, फराह खान, भारती सिंह या तिघांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात एका समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याची फिर्याद डिसेंबर 2019 मध्ये दाखल झाली होती. तपासाकामी हा गुन्हा मालाड पोलीस ठाण्याकडे वर्गही करण्यात आला होता. मात्र, त्यांनी गुन्ह्याचा तपास करण्यास नकार दिल्याने आता तोफखाना पोलिसच या गुन्ह्याचा तपास करतील.
हारुण मुलानीपोलीस निरीक्षक, तोफखाना, नगर.