नवी दिल्ली – युवा सलामीवीर पृथ्वी शॉने प्रदीर्घ कालावधीनंतर क्रिकेटमध्ये पुनरागमन करत तुफानी शतक ठोकले. रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळताना त्याने शानदार शतक झळकावले. या शानदार खेळीनंतर पृथ्वीने मोठे वक्तव्य करताना सध्या मी भारतीय संघात पुनरागमन करण्यावर लक्ष केंद्रित करत नाही, असे म्हटले आहे.
युवा फलंदाज पृथ्वी शॉ बऱ्याच दिवसांपासून दुखापतग्रस्त होता. त्यामुळे, रणजी ट्रॉफीच्या संपूर्ण मोसमातून तो बाहेर पडेल असे सर्वांना वाटत होते. पण त्याला खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने शतकही केले. पृथ्वी शॉने १८५ चेंडूत १५९ धावांची खेळी करत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले.
#U19WorldCup #AUSvsIND Final : 140 कोटी भारतीयांचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले…
तो पुढे म्हणाला की, मी फार पुढचा विचार करत नाही आणि मला वर्तमानात जगायचे आहे. माझ्याकडून काही अपेक्षा नाहीत. मी पुन्हा क्रिकेट खेळू शकलो याचा मला आनंद आहे. मुंबईसाठी रणजी करंडक जिंकणे हे माझे लक्ष्य आहे, असेही तो यावेळी म्हणाला.