मुंबई – देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतील सर्वात मानाची समजली जात असलेली रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी मुंबईचे नेतृत्व धडाकेबाज सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ याच्याकडे सोपवण्यात आले आहे.
41 वेळा रणजी करंडक जिंकलेल्या मुंबईचा एलिट क गटात समावेश आहे. मुंबईची सलामीची लढत येत्या 13 जानेवारीला महाराष्ट्राशी होणार आहे, तर दुसरी लढत 20 जानेवारीला दिल्लीशी होणार आहे.
संघ – पृथ्वी शॉ (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, आकर्षित गोमेल, अरमान जाफर, सरफराज खान, सचिन यादव, आदित्य तरे (यष्टिरक्षक), हार्दिक तामोरे (यष्टिरक्षक), शिवम दुबे, अमन खान, शाम्स मुलान, तनुष कोटियन, प्रशांत सोलंकी, शशांक अत्तार्डे, धवल कुलकर्णी, मोहित अवस्थी, प्रिन्स बदियानी, सिद्धार्थ राऊत, रॉयस्टन डायस, अर्जुन तेंडुलकर.