Mumbai vs Vidarbha (MUM vs VID) Ranji Trophy 2023-24 Final, 1st day Stumps : गेल्या काही महिन्यांपासून खेळण्याबाबत अनेक वादविवाद झालेल्या स्पर्धेचा अंतिम सामना रविवारपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू झाला आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर 41 वेळची चॅम्पियन मुंबई आणि दोन वेळचा चॅम्पियन विदर्भ यांच्यात रणजी ट्रॉफीचा जेतेपदाचा सामना खेळला जात आहे.
विदर्भाचा कर्णधार अक्षय वाडकरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने पहिल्या डावात 224 धावा केल्या. प्रत्युत्तरात विदर्भाचा पहिला डाव सुरू आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत विदर्भाने पहिल्या डावात तीन गडी गमावून 31 धावा केल्या होत्या. पहिल्या डावाच्या आधारे विदर्भ अजूनही मुंबईपेक्षा 192 धावांनी पिछाडीवर आहे.
A fascinating opening day of the #RanjiTrophy Final comes to an end!
Vidarbha reach 31/3 in response to Mumbai’s 224.
See you tomorrow for Day 2 action.
Scorecard ▶️ https://t.co/L6A9dXYmZA#MUMvVID | #Final | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/jYjjwSyDgg
— BCCI Domestic (@BCCIdomestic) March 10, 2024
शार्दुल ठाकूरने ध्रुव शौरेला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याला खातेही उघडता आले नाही. तर धवल कुलकर्णीने अमन मोखाडे आणि करुण नायरला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. अमन आठ धावा करून बाद झाला. त्याचवेळी करुणला खातेही उघडता आले नाही. सध्या अथर्व तायडे 21 धावा करून तर आदित्य ठाकरे खाते न उघडता क्रीजवर आहे.
मुंबईचा पहिला डाव 224 धावांवर गारद…
मुंबईची सुरुवात चांगली झाली. पृथ्वी शॉ आणि भूपेन लालवानी यांनी पहिल्या विकेटसाठी 81 धावांची भागीदारी केली. यश ठाकूरने ही भागीदारी तोडली. त्याने भूपेनला अक्षयकरवी झेलबाद केले. त्याला 37 धावा करता आल्या. यानंतर हर्ष दुबेने पृथ्वीला क्लीन बोल्ड केले. त्याला 46 धावा करता आल्या. या दोन विकेट्सनंतर विकेट्सची झुंबड उडाली. मुशीर खान सहा धावा करून बाद झाला, कर्णधार अजिंक्य रहाणे सात धावा करून, श्रेयस अय्यर सात धावा करून आणि हार्दिक तामोरे पाच धावा करून बाद झाला. शम्स मुलानी 13 धावा करून बाद झाला.
Ranji Trophy 2023-24 (Final) : रहाणे-अय्यर फायनलमध्येही ठरले फ्लॉप….
शार्दुल ठाकूरने मुंबईसाठी सर्वाधिक 75 धावांची खेळी खेळली आणि त्याने 69 चेंडूत 8 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 75 धावा केल्या आणि तो त्याच्या संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. पृथ्वी शॉ आणि शार्दुल ठाकूर यांच्याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला अपेक्षित कामगिरी करता आली नाही आणि मुबंईचा संघ 224 धावांवर गारद झाला.
विदर्भासाठी यश-हर्षची शानदार कामगिरी…
यश ठाकूर आणि हर्ष दुबे यांनी अंतिम सामन्यात मुंबईविरुद्ध शानदार गोलंदाजी केली. यशने 11 षटकात 54 धावा देत 3 बळी घेतले. त्याने 2 मेडन षटकेही टाकली. हर्षने 20 षटकात 62 धावा देत 3 बळी घेतले. त्याने 3 निर्धाव षटके टाकली. उमेश यादवने 13.3 षटकात 43 धावा देत 2 बळी घेतले. तर 1 विकेट आदित्य ठाकरेच्या खात्यात गेली.