Nyay Yatra In Maharashtra : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी सुरत येथील स्वराज आश्रमाला भेट दिली आणि गुजरातमधील त्यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’च्या शेवटच्या टप्प्यात सरदार वल्लभभाई पटेल यांना आदरांजली वाहिली.
राहुल गांधी यांची ही यात्रा गेले चार दिवस गुजरात दौऱ्यावर होती. चार दिवसांत गुजरातमधील सात जिल्हे व्यापल्यानंतर या यात्रेचा गुजरात दौरा पूर्ण झाला. आता एक दिवसाच्या विश्रांतीनंतर ही यात्रा मंगळवारी महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातून पुन्हा सुरू होणार आहे. | Nyay Yatra In Maharashtra
गांधींनी सुरत जिल्ह्यातील बारडोली येथील स्वराज आश्रमाला भेट देऊन सरदार वल्लभभाई पटेल यांना श्रद्धांजली अर्पण केली. ते सरदार वल्लभभाई पटेल यांनी १९२२ मध्ये उभारलेल्या स्वराज निवासात गेले. | Nyay Yatra In Maharashtra
दिल्ली-हरियाणा येथे जमलेल्या विविध राज्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होत असताना भारत जोडो न्याय यात्रेसाठी हा एक प्रेरणादायी क्षण होता, असे कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी नमूद केले. राहुल गांधी नंतर तापी जिल्ह्यातील व्यारा येथून या यात्रेचा गुजरात टप्पा पूर्ण करून नवी दिल्लीला रवाना झाले. या यात्रेने राज्याच्या सात जिल्ह्यांमध्ये चार दिवसांत ४०० किलोमीटरहून अधिक अंतर कापले. | Nyay Yatra In Maharashtra