Ranji Trophy 2023-24, Mumbai vs Vidarbha Final : रणजी ट्रॉफी 2024 च्या अंतिम फेरीत विदर्भाचा पराभव करून मुंबईने 42 व्यांदा स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या सामन्यात मुंबईने शानदार पुनरागमन करत विजय मिळवला. पहिल्या डावात सुमार कामगिरीनंतर झालेल्या चुकामध्ये सुधारणा करत 418 धावा काढताना मुंबईने दुसऱ्या डावात कहर केला आणि विदर्भासमोर 538 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले. मात्र सामन्याच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत विदर्भ संघाने अनेक चुका केल्या, त्यामुळे त्यांना विजेतेपदाचा सामना गमवावा लागला. जाणून घेऊया…विदर्भ संघाच्या पराभवाची मोठी कारणे.
1. खराब गोलंदाजी…
या सामन्यात विदर्भ संघाने खराब गोलंदाजी केली. पहिल्या डावात मुंबईला 224 धावांत गुंडाळले असले तरी दुसऱ्या डावात मुंबईच्या फलंदाजांसमोर गोलंदाजी आक्रमण पूर्णपणे असह्य दिसले आणि मुंबईने दुसऱ्या डावात 418 धावा ठोकल्या.
2. फलंदाजांकडूनही निराशा…
गोलंदाजीसोबतच विदर्भ संघाची फलंदाजीही अत्यंत खराब झाली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना विदर्भाने मुंबईला 224 धावांत गुंडाळले होते. पण त्यानंतर पहिल्या डावात फलंदाजी करताना विदर्भाचा संघ अवघ्या 105 धावांत गारद झाला. संघाच्या सहा फलंदाजांना दुहेरी आकडाही पार करता आला नाही, त्यात दोन फलंदाज शून्यावरच माघारी परतले.
3. पहिल्या डावात लवकर सर्वबाद होणे
पहिल्या डावात लवकर ऑलआऊट होणं हे विदर्भाच्या अंतिम फेरीतील पराभवाचे सर्वात मोठे कारण होते. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 224 धावा ठोकल्या होत्या. पण प्रत्युत्तरात आघाडी घेण्याऐवजी विदर्भाचा संघ 105 धावांवर ऑलआऊट झाला आणि धावांच्या ओझ्याखाली दबला गेला.
Ranji Trophy 2024 Final : मुंबईचे विक्रमी 42वे विजेतेपद! विदर्भाची झुंज अपयशी…
4. संधी गमावणे
पहिल्या डावात मुंबईला लवकर सर्वबाद केल्यानंतर विदर्भ संघ अंतिम फेरीत मुंबईविरुद्ध मिळालेल्या संधींचा फायदा उठवण्यात अपयशी ठरला. विदर्भाच्या गोलंदाजांनी मुंबईला पहिल्या डावात 224 धावांत गुंडाळले होते. त्यानंतर पहिल्या डावात फलंदाजी करताना विदर्भ अवघ्या 105 धावांत सर्वबाद झाला. विदर्भाने मुंबईविरुद्ध पहिल्या डावात मोठ्या धावसंख्येवर आघाडी घेतली असती तर दबावामुळे सामन्याचा निकाल वेगळा लागला असता.