Ramdas Athawle । देशात लोकसभा निवडणुकांची घोषणा कधीही होऊ शकते. त्याच पार्श्वभूमीवर सर्व पक्ष कामाला लागले असल्याचे दिसत आहे. कुठे पाठिंबा तर कुठे माघार अशी एकूणच संपूर्ण देशात परिस्थिती आहे. दरम्यान या सगळ्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) – आठवले गटचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी,त्यांच्या पक्षाचा देशभरातील भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) लोकसभा उमेदवारांना पाठिंबा असेल अशी घोषणा केलीय.
एनडीए जागा 400 चा आकडा पार करेल Ramdas Athawle ।
रामदास आठवले यांनी माध्यमांशी संवाद साधताना लोकसभेच्या निवडणुकीविषयी भाष्य केले. यावेळी बोलताना, पंतप्रधान मोदींच्या सक्षम मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली एनडीए तिसऱ्यांदा प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करून इतिहास रचणार आहे. या निवडणुकीत एनडीए जागा 400 चा आकडा पार करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पुढे बोलताना आठवले यांनी, ‘इंडिया’ आघाडीसह सर्व विरोधी पक्ष एनडीएवर राज्यघटना बदलल्याचा खोटा आरोप करत आहे. तसेच सरकारविरोधात खोटा प्रचार करत आहेत. त्यामुळे मी देशातील जनतेला आवाहन करतो की, लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांनी केलेल्या खोट्या प्रचाराला धडा शिकवा” असे त्यांनी म्हटले.
‘काँग्रेसला 40 जागाही जिंकता येणार नाहीत’ Ramdas Athawle ।
त्यासोबतच आठवले यांनी काँग्रेसवर यावेळी सडकून टीका केली. “पंतप्रधान मोदी हे संविधान निर्माते बाबा साहेबांच्या स्वप्नातील भारत घडवण्याचे काम करत आहेत, त्यांच्या संविधानाला प्रेरणास्थान मानत आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस ४० चा आकडाही स्पर्श करू शकणार नाही, अशी टीका यावेळी त्यांनी केली.
नवी दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री म्हणाले की, गेल्या 10 वर्षात एनडीए सरकारने सर्व घटकांना न्याय देण्याचे काम केले आहे, असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारच्या कामही कौतुक केले.
हेही वाचा
रालोआच्या उमेदवारांना रिपाईंचा पाठिंबा – रामदास आठवले