मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड पुकारल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांनी ४६ आमदार आपल्यासोबत असल्याचे संगितले आहे. महाविकास आघाडी सरकारवर टांगती तलवार असल्याचे बोलले जाते आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटत असताना आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. “राष्ट्रवादीतील काही नेत्यांच्या सत्तापिपासू वृत्तीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही” असे त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हंटल्यामुळे नक्की कोणत्या नेत्यावर शेट्टी यांचा रोख कोणाकडे आहे ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
@ANI pic.twitter.com/XpTXzfqhjq
— Raju Shetti (@rajushetti) June 22, 2022
महाराष्ट्राच्या विधानसभेची नगरपालिका…
राजू शेट्टी यांनी ट्विट मध्ये म्हंटले आहे की , महाराष्ट्राच्या विधानसभेची नगरपालिका झालेली बघून लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसाच्या मनाला वेदना होत आहेत. अर्थात राष्ट्रवादीतील काही नेत्यांच्या सत्तापिपासू वृत्तीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे मत राजू शेट्टींनी व्यक्त केलंय. त्यामुळे, राजू शेट्टींनी नेमका कोणत्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.