मुंबई :एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे राज्यात सत्तांतरापासून ते अगदी राष्ट्रपती लागवट लागू होणार का ? अशा सर्व चर्चांना ऊत आला आहे. त्यातही “संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीच्या दिशेने..” असे ट्विट केल्यामुळे खरचं विधानसभा बरखास्त होणार का ? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मात्र राऊत यांचे ट्विटला नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीचया दिशेने..
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 22, 2022
“संजय राऊत यांना संविधान आणि त्यातील तरतुदी कळण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.निवडणुका होणार, असे घाबरवून आमदारांना धमक्या काय देताय? सरकार वाचविण्यासाठी?चिंता नको, महाराष्ट्रात नवे सरकार येणार, विकास पर्व पुन्हा नव्याने सुरू होणार ! “असे आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे. मात्र भाजप नेते नितेश राणे यांनी राऊतांना याच वक्तव्यावरून सुनावलं आहे. निवडणुका होणार, असं सांगून शिवसेना खासदार संजय राऊत आमदारांना घाबरवत आहेत. धमक्या देत आहेत, असा पलटवार नितेश राणेंनी केलाय.
संजय राऊत यांना संविधान आणि त्यातील तरतुदी कळण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.
निवडणुका होणार, असे घाबरवून आमदारांना धमक्या काय देताय?
सरकार वाचविण्यासाठी?
चिंता नको, महाराष्ट्रात नवे सरकार येणार,
विकास पर्व पुन्हा नव्याने सुरू होणार !— nitesh rane ( Modi ka Parivar ) (@NiteshNRane) June 22, 2022
संजय राऊत यांना संविधान आणि त्यातील तरतुदी कळण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.
निवडणुका होणार, असे घाबरवून आमदारांना धमक्या काय देताय?
सरकार वाचविण्यासाठी?
चिंता नको, महाराष्ट्रात नवे सरकार येणार,
विकास पर्व पुन्हा नव्याने सुरू होणार !— nitesh rane ( Modi ka Parivar ) (@NiteshNRane) June 22, 2022