Rajouri Encounter : जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये 25 तास चाललेल्या ऑपरेशननंतर लष्कराकडून मोठे वक्तव्य जारी करण्यात आले आहे. लष्कराकडून ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटवली गेली असून ठार झालेले सर्व दहशतवादी पाकिस्तानी लष्कराचे निवृत्त सैनिक होते. असे लष्कराने म्हटले आहे. त्यामुळे भारतावर पाकिस्तनाच्या निवृत्त लष्कराने हल्ला केला असल्याचे दिसून येत आहे.
लष्कराच्या उत्तरी कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी या हल्ल्याविषयी माहिती दिली. पाकिस्तान परदेशी दहशतवाद्यांना इथे आणून रक्तपात पसरवण्याचा प्रयत्न करतो कारण इथे स्थानिक गरज नाही आणि या परदेशी दहशतवाद्यांना संपवण्याचा आमचा प्रयत्न आहे. कारीचे मिशन संपल्यानंतर सुरक्षा दलांचे मनोबल उंचावले आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे स्थानिक लोकांचे मनोबलही वाढले आहे आणि जे लोक भीतीच्या वातावरणात जगत होते ते भीतीतून बाहेर आले आहेत,” असेही त्यांनी यावेळी म्हटले.
राजोरी हल्ल्यात ठार झालेल्या दहशतवादी कारीच्या हत्येमुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. राजौरी आणि पूंछ आणि कारीमध्ये सुरू असलेल्या दहशतवादाला त्याचे सोबत आणायचे होते. कारीच्या मृत्यूनंतर पाकिस्तानच्या षड़यंत्रात उभी फूट पडली आहे. पीर पांचाळमध्ये अजूनही 20 ते 25 दहशतवादी सक्रिय आहेत आणि आम्ही ज्या प्रकारे कारवाई वाढवली आहे, आम्ही एका वर्षात या सर्व दहशतवाद्यांवर नियंत्रण मिळवू, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
उपेंद्र द्विवेदी यांनी,”भारतीय लष्कराकडून सर्वप्रथम मी त्या पाच शूर जवानांचे कौतुक करू इच्छितो ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन यश मिळवले आहे. मारले गेलेले दोन्ही दहशतवादी गेल्या एक वर्षापासून अशी घृणास्पद कृत्ये आणि हत्या करत होते आणि आम्हाला ते सापडत नव्हते आणि ते लपून बसले होते. कुठून तरी शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्याची खेप या दहशतवाद्यांपर्यंत पोहोचत होती,” अशी माहिती देण्यात आली आहे.