मुंबई – राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी संपर्काचा भाग म्हणून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नुकताच उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. या फोन संभाषणाची सुरूवात राजनाथसिंह यांनी “अस्सलाम अलैकुम” अशा शब्दाने केली होती. पण त्यांची ही डिवचण्याची भाषा लक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांनी त्यांना आम्ही महाविकास आघाडी सोबत गेलो असलो तरी आम्ही अजून हिंदुत्व विसरलेलो नाही याची जाण करून दिल्यानंतर राजनाथ सिंह यांनी त्यांना “जय श्रीराम” असे संबोधत पुढील संवाद चालू ठेवला.
हा किस्सा स्वत: उद्धव ठाकरे यांनीच शिवसेनेच्या एका बैठकीत सांगितल्याचे वृत्त एका संकेत स्थळावर प्रकाशित झाले आहे. उद्धव ठाकरे सध्या पक्षाची संघटना मजबूत करण्यासाठी आपल्या निवासस्थानी पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत.
अशाच प्रकारे त्यांनी पक्षाच्या माजी आमदारांचीही एक बैठक बोलावली होती. त्यात त्यांनी वरील घटनेचा उल्लेख केल्याचे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. राष्ट्रपतीपदासाठी विविध राजकीय पक्षांच्या प्रमुखांना संपर्क करण्याची जबाबदारी सध्या संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्यावर आहे. त्यानुसार त्यांनी शिवसेनेचे प्रमुख या नात्याने उद्धव ठाकरे यांच्याशी फोन संपर्क साधला होता.
गोव्यातील कॉंग्रेस आमदारांचे बंड तूर्तास फसले; …अशी होती ऑफर