पणजी – गोव्यातील कॉंग्रेस आमदारांचे बंड तूर्तास फसले आहे. गोव्यात कॉंग्रेसचे एकूण 11 आमदार आहेत. त्यातील किमान आठ आमदार फुटले तरच ती पक्षांतरबंदी कायद्यानुसार अधिकृत फूट मानली जाणार आहे. तितके आमदार बंडखोरांच्या गळाला लागले नाहीत त्यामुळे बंडखोरांचे नेते मानले जाणारे दिगंबर कामत यांच्या गटात गेलेल्या सहा आमदारांपैकी सर्वजण पुन्हा मूळ कॉंग्रेस पक्षात आले आहेत. तथापि, असे असले तरी अजूनही बंडखोर आमदार भाजपच्या संपर्कात आहेत असे सांगितले जात आहे.
कॉंग्रेसच्या सूत्रांनी सांगितले की, गोव्यात महाराष्ट्र शैलीने कॉंग्रेसमध्ये फूट पाडण्याची भाजपची योजना होती. त्यासाठी प्रत्येक कॉंग्रेस आमदाराला 15 ते 20 कोटी देण्याची ऑफर देण्यात आली होती सहा कॉंग्रेस आमदारांना राज्याबाहेर घेऊन जाण्यासाठी चार्टर्ड विमानही तयार ठेवण्यात आले होते. पण अपेक्षित संख्याबळ न जमल्याने त्यांचे हे बंड फसले आहे.
सोमवारी रात्री कॉंग्रेसचे गोव्याचे प्रभारी दिनेश गुंडूराव व केंद्रीय निरीक्षक मुकुल वासनिक यांनी बोलावलेल्या पक्षाच्या बैठकीला 11 आमदारांपैकी 10 जण उपस्थित होते. केवळ बंडखोर आमदारांचे नेतृत्व करणारे दिगंबर कामत मात्र अनुपस्थित होते. दिगंबर कामत हे गोव्यातील कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री आहेत.
मोदींनी अनावरण केलेल्या नव्या राष्ट्रचिन्हावरून वादंग; बेकायदेशीरपणे बदल केल्याचा आरोप
विरोधी पक्षनेते माईकल लोबो हे कॉंग्रेसमध्ये परतले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, आपण कॉंग्रेस पक्षातच आहोत. आपली काही जणांनी जाणीवपूर्वक बदनामी केली आहे. पण दरम्यानच्या काळात दिगंबर कामत यांच्यासह माईकल लोबो यांनाही अपात्र ठरवले जावे अशी मागणी कॉंग्रेस पक्षाने विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी डॉ. रामास्वामी एन. नोडल अधिकारी