मुंबई – राजस्थान रॉयल्सचा फलंदाज रियान पराग व रॉयल चॅलेंजर बेंगळरूचा गोलंदाज हर्षल पटेल यांच्यात सामन्यात वाद झाला. मात्र, त्यानंतर सामना संपल्यावरही हर्षलचे परागबाबतचे वर्तन अत्यंत वादग्रस्त होते. खिलाडूवृत्तीला काळिमा फासल्या गेलेल्या त्याच्या वर्तनामुळे आता काय कारवाई होणार ते बीसीसीआयकडून लवकरच जाहीर केले जाणार आहे.
राजस्थान आणि बेंगळुरू यांच्यातील सामन्यादरम्यान पराग व हर्षल यांच्यात वाद घडला. त्याच्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राजस्थानच्या डावातील अखेरच्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या हर्षलच्या गोलंदाजीवर परागने चौकार व षटकारांची आतषबाजी केली. त्याचवेळी त्यांच्यात वादाला सुरुवात झाली.
हर्षलच्या या षटकात परागने 18 धावा काढल्या. त्याने 31 चेंडूत 56 धावांची नाबाद खेळी खेळली. रियान परागने शेवटच्या षटकात हर्षल पटेलला एक चौकार आणि दोन षटकार ठोकले. राजस्थानचा डाव संपल्यानंतर पराग डगआऊटकडे जात असताना हर्षल पुन्हा त्याला काहीतरी बोलला त्यावर पुन्हा वाद झाला.
— Peep (@Peep_at_me) April 26, 2022
सामना संपल्यानंतर जेव्हा दोन्ही संघाचे खेळाडू एकमेकांना हस्तांदोलन करत होते. तेव्हाही हर्षलने परागशी हस्तांदोलन केले नाही. यामुळे खेळभावनेला धक्का बसल्याची मतेही व्यक्त झाली. त्यामुळे आता बीसीसीआय यावर काय भूमीका घेते याकडे लक्ष लागले आहे.