कोल्हापूर – महाराष्ट्रात गेले काही दिवसांपासून असणारा पावसाचा जोर अद्याप कायम आहे. त्यामुळे अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही ठिकाणी तर नद्यांना पुर आल्याने गावांचा सपंर्क तुटला आहे. दरम्यान, राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी राज्यातील नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.