लडाखमध्ये चिनी सैनिकांसोबत झालेल्या हिंसक चकमकीत 20 भारतीय सैनिक शहीद झाले. या घटनेचा संपूर्ण देशातून निषेध केला जात असून देशात चीनविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे. त्यातच या घटनेचा निषेध करत कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आता मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट करत सरकारला प्रश्न विचारला की आपल्या सैनिकांना शहीद होण्यासाठी निशस्त्र का पाठवले गेले?
कौन ज़िम्मेदार है? pic.twitter.com/UsRSWV6mKs
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 18, 2020
मोदी सरकारला प्रश्न करत राहुल गांधी म्हणाले कि, ‘चीन ची हिम्मत कशी झाली कि त्यांनी आमच्या निशस्त्र सैनिकांना जीवे मारले? आणि प्राण गमावलेले आमचे सैनिक निशस्त्र का पाठवण्यात आले? चीन ने भारतीय शस्त्रहीन जवानांची हत्या करून खूप मोठा गुन्हा केला आहे, मी असे विचारतो कि, या वीरांना निशस्त्र धोक्याच्या ठिकाणी कोणी पाठवले ? आणि का पाठवले? यासाठी कोण जबाबदार आहे? ‘