नवी दिल्ली: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गुरुवारी गरीब आणि गरजूंसाठी मदत पॅकेज जाहीर केले. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, मोदी सरकारने योग्य दिशेने पाऊल उचलले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गुरुवारी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत करोना विषाणूच्या साथीवर आणि त्याच्या आर्थिक परिणामापासून मुक्त होण्यासाठी 1.70 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. ही रक्कम गरजूंना मदत म्हणून दिली जात आहे.
राहुल गांधी यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, ‘आज सरकारने आर्थिक मदत पॅकेजची घोषणा करणे ही योग्य दिशेने पहिले पाऊल आहे. या लॉकडाऊनचा सामना करत असलेल्या शेतकरी, रोजंदार, कामगार, महिला आणि वृद्धांचे भारतावर कर्ज आहे.
मदत पॅकेजेसमधील सर्व प्रकारच्या लोकांच्या मदतीचा विचार करून अर्थमंत्र्यांनी हे पाऊल उचलले आहे. कोरोना विषाणूच्या साथीवर उपाय म्हणून काम करणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी 50 लाख रुपयांचे विमा संरक्षण जाहीर केले आहे.
आरोग्य सेवकांना मिळणार 50 लाखांचे विमा संरक्षण; वाचा पाच महत्वाच्या गोष्टी