Rahul Gandhi On Adani : काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी पुन्हा एकदा प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी त्यांच्या कोळसा व्यवसायाचा मुद्दा उपस्थित करत मोदी सरकारला धारेवर धरले. परदेशी वृत्तपत्र (लंडन) फायनान्शियल टाईम्सचा हवाला देत राहुल गांधी यांनी अदानी समूहावर ३२ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला.
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आज याविषयी पत्रकार परिषद घेत अदानी यांच्यावर आरोप केले. यावेळी त्यांनी, “आधी आम्ही 20 हजार कोटी रुपयांबद्दल बोललो होतो आणि हा पैसा कोणाचा आहे आणि कुठून आला असे प्रश्न विचारले होते. आता 20 हजार कोटींचा आकडा चुकीचा होता, त्यात 12 हजार कोटींची भर पडली असून एकूण आकडा 32 हजार कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
पुढे बोलताना त्यांनी देशातील वीजबिल वाढवण्यामागे अदानी समूहाचा हात असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. याविषयी बोलताना, अदानी इंडोनेशियाममधून जो कोळसा खर्डी करतात त्याचा भारतात दर दुप्पट करतात. त्यातून त्यांच्या कंपनीला फायदा होतो असा आरोपही त्यांनी केला. राहुल गांधी म्हणाले, ‘लोक विजेचे स्विच चालू करताच अदानींच्या खिशात पैसे जातात. यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अदानींवर वरदहस्त असल्याचे म्हटले. भारतात अदानीला कोरा चेक देण्यात आला आहे असे त्यांनी म्हटले. तसेच यातून 32 हजार कोटींची संपत्ती त्यांनी जमवली आहे तसेच जनतेने हा आकडा लक्षात ठेवावा असे आवाहन देखील यावेळी राहुल गांधी यांनी केले. तसेच पंतप्रधान मोदी अदानी यांची चौकशी का करत नाही असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.
शरद पवारांच्या अदानींच्या भेटीवर प्रश्न का उपस्थित करत नाहीत, असासवाल राहुल गांधींना करण्यात आला त्यावेळी त्यांनी ‘मी शरद पवारांना विचारलेले नाही. कारण ते भारताचे पंतप्रधान नाहीत. जर शरद पवार भारताचे पंतप्रधानअसते आणि अदानींना संरक्षण देत असते तर मी हा प्रश्न शरद पवारांना विचारला असता असे सडेतोड उत्तर त्यांनी यावेळी दिले.