नवी दिल्ली -सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेत फिरकी गोलंदाज राहुल चहरने राजस्थानकडून खेळताना मध्यप्रदेशविरुद्ध पाच चेंडूत हॅट्ट्रिकसह चार बळी घेत विक्रमी कामगिरी केली.
राजस्थानकडून सहावे षटक राहुल टाकत होता. या षटकाच्या पाचव्या चेंडूवर राहुलने मध्य प्रदेशच्या वेंकटेश अय्यरला बाद केले. त्यानंतर अखेरच्या चेंडुवर राहुलने रजत पाटीदारला परतवले.
त्यानंतर पुढच्या षटकात पहिल्याच चेंडूवर राहुलने अर्पित गौडला बाद केले हॅट्ट्रिक साकार केली. त्यानंतर राहुलने अव्हेश खानलाही बाद केले व सलग पाच चेंडूंत चार बळी मिळवण्याची किमया केली.
यापूर्वी अशी कामगिरी 2013 साली अमित मिश्राने तर, 2019 साली अभिमन्यू मिथूनने केली होती. या सामन्यात राहुलने 14 धावा देत 5 गडी बाद केले. त्याच्या कामगिरीच्या जोरावरच राजस्थानने मध्य प्रदेशवर 10 धावांनी विजय मिळवला.