नवी दिल्ली – केदार जाधवच्या दमदार अर्धशतकी खेळीनंतरही महाराष्ट्राला उत्तराखंडविरुद्धच्या सय्यद मुश्ताक अली टी-20 क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना केदारने 47 चेंडूत 4 चौकार व 4 षटकार फटकावताना 61 धावांची खेळी केली. त्याला योग्य साथ देताना अझीम काझीने नाबाद 31 धावा केल्या. मात्र, अन्य फलंदाजांनी निराशा केल्यामुळे महाराष्ट्राचा डाव केवळ 20 षटकांत 4 बाद 141 धावांवर रोखला गेला.
उत्तराखंडने सलामीवीर जय गोकुळ बिश्तच्या नाबाद 69 धावांच्या जोरावर हा सामना 18.1 षटकांतच 4 बाद 145 धावा करत 6 गडी राखून जिंकला.
संक्षिप्त धावफलक –
महाराष्ट्र- 20 षटकांत 4 बाद 141 धावा. (केदार जाधव 61, अझीम काझी नाबाद 31, दिक्शांशू नेगी 1-18). उत्तराखंड – 18.1 षटकांत 4 बाद 145 धावा. (जय गोकुळ बिश्त नाबाद 69, दिक्शांशू नेगी 23, अवनिश सुधा 21, दिव्यांग हिमगणेकर 1-11).