नवी दिल्ली –पंजाबमध्ये आम आदमी पक्ष सत्तेत येऊ नये, यासाठी तसेच भगवंत मान यांना मुख्यमंत्री होण्यापासून भाजप आणि कॉंग्रेसला रोखायचे आहे.
गेल्या काही दिवसांपासून मोदी, राहुल गांधी, कॅप्टन अमरिंदर सिंग, चरणजित सिंग चन्नी आणि सुखबीर सिंग बादल हे सगळे एकत्र जमले आहेत. त्यांना भगवंत मान यांना मुख्यमंत्री होऊ द्यायचे नाही. यासाठी प्रत्येकजण रात्री बसतो आणि एकमेकांशी कॉन्फरन्स कॉल करतो, असा आरोप मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजप आणि कॉंग्रेसवर आज केला.
केजरीवाल म्हणाले, सरकार बनले तर आम्ही पंजाबमध्येही विकास करू. येथे प्रामाणिक सरकार आणले जाईल. संपूर्ण यंत्रणा आपल्या विरोधात उभी आहे. पंजाबचे 3 कोटी पंजाबी एकत्र येऊ शकत नाहीत का? ते कोणत्याही पक्षाचे असले तरी आपल्याला संपूर्ण व्यवस्थेचा पराभव करायचा आहे.