मंचर -करोना काळात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. अशा कठीण प्रसंगी काम करणारे कर्मचारी, सफाई कामगार, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, दिव्यांग बांधव म्हणजेच आरोग्यदूत आहे. त्यांच्याकडे समाजाने आदरयुक्त भावनेने पाहून त्यांना समाज प्रवाहामध्ये आणण्याचे काम समाजबांधवांनी करावे, असे आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते आणि जनसेवक संजय थोरात यांनी केले.
आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरातील सफाई कामगार, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, दिव्यांग बांधव तसेच निराधार व गरीब बांधव यांना दिवाळी सणानिमित्त फराळ संजय थोरात यांनी स्वखर्चाने साहित्य बनवण्यासाठी लागणारा शिधा व मिठाई वाटप 310 जणांना करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.यावेळी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय सेवा केंद्र मंचर संचालिका संध्या बहेन, पंचायत समिती माजी सदस्या अंजना थोरात, संजय थोरात यांच्या मातोश्री वत्सला थोरात, समर्थ केंद्र मंचरच्या भारती बंगाल, सुनीता दैनिक, शुभांगी लोहट, भाजपचे ज्येष्ठ नेते भानुदास काळे, रवींद्र त्रिवेदी, नवनाथ थोरात, बाळासाहेब कोकणे, सत्यवान रोकडे, गणेश खानदेशे, कालिदास गांजाळे, गणेश थोरात, भरत काळे, विनायक धुमाळ, प्रशांत बाणखेले, उमेश कंधारे, शिवाजी बारवे, प्रमिला निऱ्हाळी, प्राची थोरात, प्रियांका थोरात, रुपाली घोलप, स्नेहल चासकर, जागृती महाजन, गीतल गावडे व पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लक्ष्मीपूजन निमित्ताने मंचर शहरात रोज स्वच्छतेच्या माध्यमातून मंचर शहर स्वच्छ ठेवण्याचे काम करणाऱ्या तसेच आरोग्याची काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्याचे काम जनसेवक संजय थोरात यांच्या माध्यमातून गेल्या आठ वर्षांपासून करण्यात येत आहे. कार्यक्रमाची प्रस्तावना नवनाथ थोरात यांनी, सूत्रसंचालन उत्तम राक्षे यांनी तर रवींद्र त्रिवेदी यांनी आभार मानले.
“त्यांच्या’ कामाचे ऋण नकळतपणे प्रत्येकावरच
आपल्या सर्वांची आरोग्याची काळजी घेण्यासाठी व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी रोज भल्या पहाटे पासून साफसफाई करण्यासाठी व कचरा उचलण्यासाठी ही सर्व मंडळी राबत असतात. यांच्या कामाचे ऋण नकळतपणे आपल्या प्रत्येकावरच आहे. कारण आपण ज्याप्रमाणे आपल्या घराची स्वच्छता ठेवतो. त्याच प्रमाणे ही सर्व मंडळी आपल्या मंचर शहरातील परिसर स्वच्छ ठेवीत असतात, असे संजय थोरात यांनी नमूद केले.