तळेगाव ढमढेरे, (वार्ताहर)- पक्ष काढून घेण्याचं पाप करण्यात आले आहे. राज्यातील निवडणुकीत तिकिटे व ए बी फॉर्म वाटप माझ्या सहीने झाली असून ए बी फॉर्म देणारा चुकीचा म्हणजे हे पण अपात्र आहे. मंत्री मंडळ विस्ताराच्या वेळी माझ्या सहिने सर्व मंत्री मंडळाची नावे दिली. या देशात तारतम्य सोडून व्यवहार सुरू आहे. संस्थापक आहेत. त्यांच्या डोळ्यादेखत त्यांच्याकडून पक्ष काढून घेण्याचे पाप करण्यात आले आहे. तुम्ही आमदार निवडून देत तो विकत घेतला जातो. त्याला पळवले जाते ही लोकशाही सुरू आहे. अशी उद्विग्नता माजी मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली.तळेगाव ढमढेरे येथील गीताई विष्णू कार्यालयात कार्यकर्त्यांच्या धावत्या भेटी सभेवेळी ते बोलत होते.
जयंत पाटील यांनी राज्य सरकारच्या कायदा सुव्यवस्थेवर सडकून टीका करताना म्हणाले की, राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून आमदार पोलीस चौकीत गोळीबार करीत आहेत. गोळीबार झाला त्याच्या तब्बेतीबाबत काही माहिती नाही. मुख्यमंत्र्यांच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना भाजपा आमदाराला गोळ्या झाडण्याची गरज का भासली आहे. ही तरी चौकशी केली जाईल का. मी मुख्यमंत्र्यांना करोडो रुपये दिले. मुख्यमंत्री गुन्हेगार तयार करण्याचे व त्यांचे संरक्षण करण्याचे काम करीत आहे, असा आरोप होत आहे.
१५ फेब्रुवारीपासून कामे बंद ठेवा
कॉन्ट्रॅक्टरांना कंत्राट मिळूनही काम करता येत नाही, मारहाण होते. कोणतेही दोन पक्ष काम अडवतात. यामुळे १५ फेब्रुवारी पासून कामे बंद ठेवण्याचे पत्र दिले आहे. तारतम्य सोडून कारभार चालला आहे.
देशातील लोकशाही पूर्ण संपू शकते…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्ष आणि चिन्ह काल काढून घेण्यात आले शिवसेनेच्या व राष्ट्रवादी केस मध्ये बराच फरक असून येथे संस्थापक अध्यक्ष शरद पवार आहेत त्यांनी पक्ष वाढवला मेहनत केली त्यांच्या डोळ्या देखत पक्ष काढून घेण्याचे पाप करण्यात आले.भारतातील सर्वसामान्य माणसाची सदसद विवेकबुद्धी शाबूत असेल जे आज राष्ट्रवादी काँग्रेस सोबत झाले ते भारतातील सर्व पक्षांच होऊ शकते या देशातील लोकशाही पूर्ण संपू शकते याचा विचार सामान्य लोकांनी करायला हवा.
तुम्ही दिलेल्या मतावर निवडून आलेला आमदार खरेदी केला जातो , पळवून नेऊ शकतो ,कुठल्याही पक्षात निवडून येऊ द्या लोह चुंबकासारखा खरेदी करू शकतो ही लोकशाही सध्या भारतात चालू आहे.त्यामुळे न्यायाचे काम चालू नाही. असा घणाघात करत राज्य सरकारवर टीका केली. शिरूर तालुक्याच्या विकासाचे शिल्पकार शरद पवार आहेत त्यामुळे कितीही अडचणी आल्या तरी शरद पावरांची साथ सोडणार नाही असे आमदार अशोक पवार यांनी स्वागतावेळी सांगितले.
यावेळी शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, युवक अध्यक्ष स्वप्नील गायकवाड, उपाध्यक्ष बाळासाहेब नरके, शिरूर कृषी उत्पन्न बाजारात समितीचे उपसभापती विश्वास ढमढेरे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सुदीप गुंदेचा, उद्योजक राहुल करपे, तालुका महिलाध्यक्षा विद्या भुजबळ, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडित दरेकर, घोडगंगा कारखान्याचे उपाध्यक्ष पोपटराव भुजबळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिरूर तालुका शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते बाळासाहेब ढमढेरे यांनी केले. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विश्वास ढमढेरे यांनी आभार मानले.
आमदार अशोक पवार यांच्या निष्ठेचे कौतुक
पाटील म्हणाले की, शरद पवार यांच्याविषयी आमदार अशोक पवार यांच्या निष्ठेचे व सामर्थ्याने पाठीमागे उभे राहण्याचे कौतुक वाटत असून अनेक अडचणी येत असूनही ते निष्ठेने व सामर्थ्याने मागे उभे आहेत.
शरद पवार यांचे सर्वात मोठे बळ म्हणजे अशोक पवार यांच्यासारखे कार्यकर्ते, नेते त्यांच्याबरोबर आहे. सत्तेपुढे न झुकता पडेल ती किंमत देण्याची अशोक पवार यांची मानसिकता मी काही महिन्यांपासून पाहत आहे. त्रास होतोय, त्रास दिला जातोय कारखान्याचा प्रश्न सुटला असता तो कसा जटिल कसा होईल यासाठी काही घटना घडल्या आहेत. अशोक पवार यांच्या निष्ठेचे कौतुक केले. यावर उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला.