pune news : मुंबई महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) पथकाने पुणे ग्रामीण परिसरातून सुमारे ५० कोटी रुपयांचे १०१ किलो मेथाक्युलोन हा अंमली पदार्थ जप्त केला होता. मात्र, सेंट्रल फाॅरेसिंक सायन्स लेबोरेटरीच्या रिपोर्टमध्ये तो मेथाक्युलोन नसल्याचा अहवाल आला आहे.
मेथाक्युलोन तर नाहीच तर तो इतर काॅमन अमली पदार्थ नसल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणात अटक केलेल्या तिघांना अमली पदार्थ कायद्याचे विशेष न्यायालय जे.जी.डोरले यांनी जामीन मंजुर केला आहे.
जरी व्यावसायिक प्रमाणात साठा जप्त करण्यात आला. तरीही अशा परिस्थितीत त्यांना कारागृहात ठेवणे योग्य नसल्याचा निष्कर्ष काढत न्यायालयाने हा निकाल दिला.
मोहनलाल बंग, अक्षय बंग (दोघेही, रा. मुंबई) आणि कोडूस श्रीधर (रा. तेलंगणा) या तिघांना जामीन मिळाला आहे. बचाव पक्षातर्फे अॅड. खंडेराव टाचले, अॅड.मनिष मगर, अॅड.चंद्रकांत कचरे, अॅड.आकाश बिराजदार, अॅड.ज्योती गुंजाऴ-खेसे, अॅड.महेंद्र सिंग यांनी काम पाहिले.
पुणे परिसरातून इतक्या मोठ्या प्रमाणावर डीआरआय पथकाने प्रथमच अमली पदार्थ जप्त केले होते. याबाबत डीआरआयच्या पथकाकडून तेलंगणा, महाराष्ट्र, दिल्ली आणि हरियाणा येथील रहिवासी असलेल्या पाच आरोपींना अटक केली होती.
अमली पदार्थ विरोधी कायद्यातील एनडीपीएस कायदा १९८५ च्या तरतुदीनुसार सदरची कारवाई करण्यात आली आहे. मुंबई डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पुण्यातून एक संशयित वाहन जप्त करण्यात आले होते. प्रकरणात तिघांनी जामिनासाठी अर्ज केला होता