पुणे – येरवडामधील शास्त्रीनगर परिसरात लोखंडी जाळी पडून 5 कामगारांच्या मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या पाच जणांना 15 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. घटनास्थळाची मालकी वाडीया यांची आहे. त्यामुळे जागा मालक आणि ब्लु ग्रास बिझनेस पार्कचे लायझनिंग काम पाहणारी लॅंडवाईज प्रा.लि. आणि कन्स्ट्रक्शनचे काम पाहणारे मे. अहलुवालिया कन्स्ट्रक्शन इंडिया लि. यांचा एकमेकांशी झालेल्या कराराबाबत कागदपत्रे प्राप्त करायची आहेत. आणखी कोणाचा गुन्ह्यात सहभाग् आहे का, याच्या शोधासाठी पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील योगेश कदम यांनी केली.
प्रोजेक्टचा सिनिअर सेफ्टी सुपरवायझर इमतियाज अबुल बरकात अन्सारी ( वय 38, रा. बिहार), लेबर कॉक्ट्रक्टर सुपरवायझर मोहम्मद शरीफ हबीबूल रहेमान आलम (वय 35, रा. बिहार), प्रोजक्ट मॅनेजर असिस्टंट विजय एकनाथ धाकतोडे (वय 25, रा. शिक्रापूर) व प्रोजक्ट मॅनेजर मजीद अलीसा खान ( वय 45, रा. बिहार) अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत.
याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर रस्त्यावर शास्त्रीनगर चौक परिसरात वाडिया यांच्या जागेत वरदे हाईट्स शेजारी ब्लु ग्रास बिझनेस पार्क या इमारतीच्या टॉवर बीच्या नवीन इमारत बांधकाम सुरू असून त्याचा पायाचे खोदला जात होता. येथे हे कामगार काम करत होते. बेसमेंटला स्लॅब टाकण्याची तयारी केली होती. स्लॅब टाकण्यासाठी लोखंडी जाळीचे भले मोठेकडे करण्यात आले होते.
दरम्यान रात्री कामगार खाली काम होते आणि ही जाळी त्याठिकाणी कडेला उभा केली होती. मात्र अचानक जाळी निसटली व कामगारांच्या अंगावर पडली. लोखंडाची जाडजूड जाळी असल्याने या कामगाराना जबर मार लागला. तर काही कामगार त्या खाली दबले गेले. त्यात पाच कामगारांचा मृत्यू झाला. तसेच पाच कामगार जखमी झाले होते. या प्रकरणात चौघांना पोलिसांनी न्यायलयात हजर केले. त्यावेळी पोलीस इतर आरोपींचा शोध पोलीस घेत असून, अद्याप त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. पोलीस कोठडी देण्याची मागणे करण्यात आली.