दिनकर सबनीस : ओझर येथे ग्रंथ दिंडीने ग्राहक पंचायतीची सुवर्ण महोत्सवी वर्षाची सांगता
नारायणगाव – वस्तूचा उत्पादन खर्च कोणतीही कंपनी जाहीर करत नाही; परंतु वस्तूची विक्री करताना “एमआरपी’च्या नावाखाली ग्राहकांची होणारी लूट थांबवण्यासाठी उत्पादन खर्च किती आला, याची माहिती ग्राहकांना मिळणे बंधनकारक आहे, त्यासाठी एक जन आंदोलन उभे राहिले. यासाठी एक विशिष्ट पॉलिसी तयार करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय संघटन मंत्री दिनकर सबनीस यांनी केले.
ओझर (ता. जुन्नर) येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या सुवर्ण महोत्सवी सांगता सोहळ्यात सबनीस बोलत होते. याप्रसंगी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण शहा, आमदार अतुल बेनके, राष्ट्रीय उपाध्यक्ष सूर्यकांत पाठक, विजय सागर, जयंती कथोरिया, गजानन पांडे, मध्य महाराष्ट्र प्रांत प्रमुख बाळासाहेब औटी, प्रांताचे संघटन मंत्री प्रसाद बुरांडे,
प्रांत सचिव संदीप जंगम, प्रांत समन्वयक दीपक इरकल जन आरोग्य अभियानाचे सहसमन्वयक डॉ. अनंत फडके, पंचायतीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य धनंजय गायकवाड, महावितरण परिमंडळ पुणे मुख्य अभियंता राजेंद्र पवार, राज्याचे सायबर सुरक्षा पोलीस अधिक्षक संजय शिंत्रे, राज्य सेवा हक्क आयुक्त दिलीप शिंदे उपस्थित होते.
आज प्रत्येक नागरिक ग्राहकाची ग्राहकांना त्यांच्या हक्कांच्या संदर्भात जागृत करून न्याय देण्याचे काम ग्राहक पंचायत गेल्या पन्नास वर्षांपासून काम करत आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायत केवळ एक संस्था नसून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारी चळवळ आहे.
– अतुल बेनके, आमदार